शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.
पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला. हुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र असे असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान अजूनही रिकामं केलेलं नाही.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे. प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.
महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात. काहीतरी बेताल विधाने करून, आरोप-प्रत्यारोप करून स्वत:ला मीडियामध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला.
एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!, असे आज घडले.
भिवंडीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्याच्या एका सहकार्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. प्रफुल्ल तांगडी हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होता.
कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्याला धोका असल्याने, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला संमती दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. तसेच बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या जागी काबुतारंना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.
खंडणीखोरांचे सरदार आपणच आहात. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा,असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.
जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील कुंडेश्वर येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची पिकअप व्हॅन भरधाव वेगात दरीत कोसळली. या अपघातात 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 7 जणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन महिलांनी रुग्णालयात नेताना प्राण सोडले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांनाच, आणखी एका विवाहितेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. रक्षाबंधनाला भावाने २० लाख रुपये नाही दिले तर त्याला मारून टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या मत चोरीच्या आरोपानंतर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राहुल गांधींपाठोपाठ आता बरेच बडे नेतेही या विषयावर अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. याच विषयावर शरद पवार यांनी देखील एक धक्कादायक विधान केलं होतं. राज्यातील २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत असतांना दोन लोकं आपल्याला भेटायला आलेली. त्यांनी आपल्याला १६० जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
बीडच्या कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी सुरू आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. दोघांनी भेटून विधानसभेत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असे दावा त्यांनी केला. आता नाव आठवत नाही असे ते म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला असून किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा असते असे ते म्हणाले.
जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App