उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
शंभर कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपवर आरोप करून अजितदादाच फसले; त्या वेळच्या अधिकाऱ्याने अजितदादांच्या भ्रष्टाचारी कळसाचे किस्से बाहेर आणले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई भाजपाचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) ‘मराठी कार्ड’वर जोरदार हल्ला चढवत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठीच नाही, तर प्रखर हिंदूच असेल,” अशा शब्दांत त्रिपाठी यांनी विरोधकांना ललकारले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप कॉंग्रेसचे आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशीह टीका चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत असतानाच, गडकरींनी या ‘प्रवेश पर्वा’कडे उपरोधिक शैलीत पाहिले. सत्ता जिथे तिथे जा आणि सत्ता बदलली की पुन्हा दुसरीकडे वळा, हे राजकारणातलं एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढलं आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप ‘राष्ट्रीय प्रवेश पार्टी’ ठरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खदखद व्यक्त केली आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीट सुद्धा काढून देईल. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांचा आज 18वा दिवस आहे. यादरम्यान, इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी जनतेचे मुख्य मारेकरी म्हटले. X वर केलेल्या एका पोस्टमध्ये अली यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचेही नाव घेतले आणि त्यांना दुसरे मारेकरी म्हटले.
सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!, असे आज पुणे महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडले.
मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!, असे राजकीय नाट्य आज पुण्यात घडले.
29 महापालिका निवडणुका संपायच्या आत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा वाजला बिगूल; 5 फेब्रुवारीला मतदान 7 फेब्रुवारीला निकाल
पुणे महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अजितदादांना तुतारीचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाला सांगावे लागले, की तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा आहे!!
भारताची आर्थिक राजधानी. हे शहर कधीच थांबत नाही असं म्हटलं जातं. पण याच मुंबईने गेल्या काही दशकांत अनेकदा रक्ताचे सडे आणि बॉम्बस्फोटांचा थरार अनुभवला आहे.
मुंबई म्हणजे तुम्ही नाही, मराठी म्हणजे तुम्ही नाही, असे ठाकरेंना म्हणणारे फडणवीस पश्चिम महाराष्ट्र सोडा, पुणे जिल्हा म्हणजे सुद्धा तुम्ही नाही
सोमवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेवर जोरदार पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी अदानीच्या मुद्द्यावरून गौतम अदानी यांची जिथे भाजपचे सरकार नाही या राज्यांमध्ये किती गुंतवणूक आहे, याची देखील आकडेवारी दाखवली. तसेच ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले, या कफन चोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार, असा इशारा देखील दिला.
आज तुम्ही म्हणताय, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्षांपूर्वी तुम्ही वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??, असा खोचक सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची शिवाजी पार्कवर पोलखोल केली.
व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!, असाच प्रकार राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या भाषणानंतर समोर आला.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली. त्यामुळे अजितदादांचा तथाकथित “गेमचेंजर” डाव मतदानापूर्वीच उधळला गेला.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संयमाची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात त्यांचा संयम ढळला आणि अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागली.
रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ मुंबई पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाला (बीडीडीएस) एक बेवारस बॅग सापडली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सकाळी ९:३० वाजता नोकरांच्या क्वार्टरजवळ एक संशयास्पद बॅग दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळवले, ज्यामुळे घेराबंदी आणि झडती घेण्यात आली. तपासादरम्यान, बॅगमध्ये बूट, कपडे आणि बॅग मोकळी असल्याचा दावा करणारी चिठ्ठी आढळली.
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.
मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App