दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.
२०१६-१७ पासून मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. याबाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोरही मांडल्या होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर परदेशातूनही दबाव येईल अन् सत्ताधाऱ्यांना जाग येईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या योजनेतून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमातून देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांची एकजूट बांधली. या एकजुटीतून सुरक्षिततेबरोबरच सक्षमीकरण आणि शक्तीचाही आत्मविश्वास महिलांना दिला
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसलेला आहे व त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतीचं झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागण्या सध्या जोर धरत आहेत. अशातच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे.
सध्या देशभरात नवीन उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार यावर सतत काही ना काही चर्चा चालू आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. पवार आणि ठाकरे गट हे नक्षल कनेक्शन असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असा सवाल भाजपाने केला होता. त्यावर शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
साऊंड सिस्टीम लावण्याच्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री जमावाने हाणामारी, दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना पेटवले. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैदोस घातला होता. रस्ते पाण्याखाली गेले, घरे कोसळली, शाळा बंद राहिल्या आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात लोकांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले होते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने नवीन इशारा दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील ९ जणांची कराड (जि.सातारा) विधानसभेच्या मतदार यादीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नावे असल्याचा आरोप कराडचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.
अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे.
देशात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी मिळालेली आहे. परंतु रेड्डी यांचे नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.
सध्या देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पुढील महिन्यात होणार असल्याने एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनी आता आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी चक्क पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या एका तरुणाने देखील अर्ज दाखल केला आहे.
धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची आणि गौडबंगालाची फाइल गायब केली आहे, असा आरोप आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कृषी विभागावरचे आरोप चर्चेत आलेत.
अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर श्री गणरायाने आगमना आधीच कृपा केलीय. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली.
सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा दाणून पराभव झालेला आहे. ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये. मात्र ठाकरे बंधूंच्या नेत्यांना हा पराभव पचवता आलेला नाहीये.
बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.
आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीचे कारण नक्की काय? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र आता स्वतः राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलेलबी ३’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. मात्र रिलीज पूर्वीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App