खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी सोमवारी गेल्या आर्थिक वर्षातील खादी इंडियाचे आकडे सादर केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत पहिल्यांदाच ९७,००० रुपयांच्या जवळ पोहोचली.
अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत जामखेड मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे.
काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातर्फे ‘पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रसल सिस्टिम’ (PGRS) याबाबत सादरीकरण करण्यात आले
ठाकरे बंधू एकत्र, पवार + काँग्रेस अस्वस्थ!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधकांची एकत्रित गोची झाली आहे. वास्तविक शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या सत्तेला आव्हान देण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या गप्पा मारत आहेत
ईश्वरी ऊर्फ मोनाली संतोष भिसे (३७) मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाले. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुश्रुत दिलीप घैसास यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परंतु ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व डॉ. घैसास यांच्यावर दोष न ठेवता इतर ३ रुग्णालयांवर खापर फोडले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ’22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला
महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरं तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवण्याची तयारी!! हा असला प्रकार राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आज अचानक सुरू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ’ येथे विविध पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित, ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
नाशिक मधला बेकायदा सातपीर दर्गा काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून शहरात मोठी दंगल घडविण्याचे कारस्थान होते पण पोलिसांनी कठोर कारवाई करून ते हाणून पाडले
अत्याचारी आयन रॅंडच्या वधानंतर फाशीवर जाताना चापेकर बंधूंना क्षणभरही पश्चाताप झाला नाही अथवा भिती वाटली नाही. त्यांच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली. पण दुर्दैवाने आपल्याला आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतिकारक परिचित आहे, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिकारकांच्या बलिदानाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून अपरिचीत अशा साडे बाराहजार क्रांतिकारकांची गाथा देशासमोर येत असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राजकीय शैलीतून इतर सर्व पक्षाच्या नेत्यांची आपल्या मागे कशी राजकीय फरफट केली
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांना लगाम घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून स्वतःकडे घेतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2) वरील डाऊनलाईन टनलचे ब्रेकथ्रू पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात खंडपीठाने फडणवीस यांना समन्स बजावले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद मागितला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती देण्यात आली. तसेच परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज 1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App