वारकऱ्यांची बदनामी करणाऱ्या विकास लवांडेंना न्यायालयाचा दणका; येरवडा कारागृहात रवानगी!!
वारकरी संप्रदायाविरुद्ध वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
वारकरी संप्रदायाविरुद्ध वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
पुण्यात एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.
मध्य प्रदेशातील बहुचर्चित भोजशाळा-कमाल मौला संकुल प्रकरणात उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पहिला शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा ठरला. गेली दोन दशके सुरू असलेली व्यवस्था बदलल्यानंतर प्रथमच येथे शुक्रवारची नमाज झाली नाही, तर मोठ्या संख्येने हिंदू भाविकांनी पूजा-अर्चा आणि महाआरतीत सहभाग घेतला. यामुळे भोजशाळा वादाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.
देशातील 10 राज्यांतील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने 18 जून रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली असून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये विशेषतः मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील जागांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारच्या रोजगारनिर्मिती मोहिमेअंतर्गत पंतप्रधान Narendra Modi यांनी 19 व्या रोजगार मेळ्यात देशभरातील 51 हजारांहून अधिक नव्याने निवड झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे वितरित केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या कार्यक्रमात विविध केंद्रीय मंत्रालये आणि सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
केंद्र सरकार राज्यांसोबत मिळून पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार लवकरच राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी करण्याची विनंती करू शकते.
पश्चिम बंगालमध्ये आधीच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांचे केलेले सगळे लाड शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने बंद करत आणले
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. अशा वेळी जेव्हा मध्य पूर्वेकडील देशांच्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला, तेव्हा व्हेनेझुएला अचानक भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला ₹2,86,588.46 कोटींचा लाभांश (नफ्याचा हिस्सा) देण्यास मंजुरी दिली आहे. शुक्रवारी RBI च्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या दोन भारतीय गिर्यारोहकांचा उतरताना मृत्यू झाला. ही माहिती शुक्रवारी नेपाळ मोहीम संचालक संघाचे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे नावाचे गिर्यारोहक एव्हरेस्टवरून उतरताना खूप थकून गेले होते. यामुळे त्यांना धाप लागली होती.
पश्चिम बंगाल सरकार अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना न्यायालयाऐवजी थेट सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सोपवेल. ही माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी दिली. नवीन नियम 20 मे पासून लागू झाला आहे.
शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांनी हा निर्णय आपल्या पतीच्या गंभीर आजारामुळे घेतला आहे. असे सांगण्यात आले आहे की, त्यांचे पती एका अत्यंत दुर्मिळ हाडांच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत आणि गबार्ड या कठीण काळात त्यांच्यासोबत राहू इच्छितात.
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले.
फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या इराण युद्धात काही आठवड्यांपासून शांततेच्या प्रयत्नांना वेग आला असला, तरी आता पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांनी इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिकन प्रशासनातील उच्चस्तरीय बैठका, इराणसोबत अडकलेल्या चर्चा आणि इस्रायलची आक्रमक भूमिका यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या शिर्डी साई मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर, राज्य कृषी विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर ‘शिर्डी डिफेन्स कॉम्प्लेक्स’ वेगाने आकार घेत आहे. येथे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर पोहोचले आहेत. ते सकाळी कोलकाता येथे पोहोचले.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी महाग होऊन ₹99.51 प्रति लिटर झाले आहे. डिझेल 91 पैशांनी प्रति लिटर महाग झाले आहे. त्याचे दर ₹92.49 वर पोहोचले आहेत.
अमेरिकेने क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांच्यावर 1996 मध्ये दोन विमाने पाडल्याबद्दल आणि चार लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले की, ही कारवाई अमेरिकन नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यावर भारताने म्हटले की, नरसंहाराचा इतिहास असलेला देश भारताच्या अंतर्गत बाबींवर भाषण देत आहे.
शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान पार पडले. एकूण २८५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ८७.७६% होती.
इराण युद्धावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांना इराणवरील हल्ले सुरू ठेवायचे आहेत, तर ट्रम्प यांना चर्चा आणि कराराला संधी द्यायची आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २६.४२ टक्क्यांनी वाढले, तर जोखीम तरतुदींपूर्वीचा खर्च २७.६० टक्क्यांनी वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेचा ताळेबंद २०.६१ टक्क्यांनी वाढून ९१,९७,१२१.०८ कोटी रुपये झाला.