Trump : अमेरिका होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी करणार; म्हटले- इराणला टोल दिल्यास रस्ता मिळणार नाही
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिकी नौदल आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना नाकाबंदी करेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिकी नौदल आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना नाकाबंदी करेल.
महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली अशी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभे करू आणि सरकारला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच.” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.
“मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ला पाठिंबा मागितला. पंतप्रधानांनी लिहिले की, आता वेळ आली आहे की हा कायदा संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लागू केला जावा.
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्यावर आज दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या.
याच वर्षापासून SSC परीक्षेत जर कोणताही प्रश्न चुकीचा किंवा स्पष्ट नसेल, तर सर्व उमेदवारांना त्याचे पूर्ण गुण दिले जातील. यासोबतच, अर्ज भरताना उमेदवार जी भाषा निवडतील, ते फक्त त्याच भाषेत परीक्षा देऊ शकतील. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) शुक्रवार, 10 एप्रिल रोजी एका नोटीसद्वारे ही माहिती दिली.
संयुक्त राष्ट्राच्या 80 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च पदावर महिला नेतृत्वाची आशा निर्माण झाली आहे. सध्याचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपेल. यावेळी चार उमेदवार शॉर्टलिस्ट झाले आहेत. यात दोन महिला मिशेल बॅचलेट (74) आणि रेबेका ग्रिनस्पॅन (70) आहेत. न्यूयॉर्कमध्ये 21-22 एप्रिल रोजी दोघांची चर्चा (वादविवाद) होईल. मिशेल चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, तर रेबेका कोस्टा रिकाच्या उपराष्ट्रपती राहिल्या आहेत.
काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, महिला आरक्षण कायद्यात होणाऱ्या सुधारणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाऊ नये, जेणेकरून संघराज्य कमकुवत होऊ नये आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये.
अष्टपैलू सूर आज हरपला. आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अतिशय कलात्मक आणि तरल भाषेत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजलीतून त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गायनाचे सूत्र जागतिक कलेशी जोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांनी पुरवा वर्धमान जिल्ह्यातील कटवा येथील निवडणूक रॅलीत सांगितले की, बंगाल बदलासाठी तयार आहे. येथील महान वारशावर टीएमसीने असे पाप केले आहे की, त्यावर मागासलेपणाचा डाग लावला आहे.
भारतीय संगीत विश्वातला अष्टपैलू सूर आज हरपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अष्टपैलू सूर हरपला. आशा भोसले यांनी आज एक्झिट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून आशाताईंच्या आठवणी जागविल्या.
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सांगितले की, मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून, वैधानिक अधिकार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे अधिकार केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच अस्तित्वात आहेत.
दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथून ‘ड्रग्स क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमला अटक केली. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शाहदरा पोलिसांनुसार, ते दोन महिन्यांपासून कुसुमचा शोध घेत होते आणि गुरुवारी ती शाहदरा येथे आल्यावर पोलिसांनी तिला घेरून अटक केली. माध्यमांना ही माहिती शनिवारी देण्यात आली.
वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.
राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, केशव बळीराम हेडगेवार यांनी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आणि हिंदूंमधील फूट संपवण्याच्या उद्देशाने RSS ची स्थापना केली होती.
CJI सूर्यकांत म्हणाले की, भारताला 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी केवळ भांडवल आणि धोरणे पुरेशी नाहीत. यासाठी मजबूत आणि विश्वासार्ह कायदेशीर व्यवस्थाही तितकीच आवश्यक असेल. गुंतवणूकदारांचा विश्वास याच व्यवस्थेवर अवलंबून असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये हलकी-फुलकी चर्चा होताना दिसली.
शांतिदूताचा बुरखा पांघरलेले पाकिस्तानी मध्यस्थीचे डेकोरेशन फसले अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानात अडचणीत आले, हे कालच्या एका रात्रीत घडले.
राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे मला दुःख वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दाव्यांचा समाचार घेतला. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.