वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Indus water भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर एकीकडे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा अब्बास युद्ध पुकारण्याच्या धमक्या देत आहेत. दुसरीकडे, युद्धाचा मनसुबा बाळगून असलेले आर्मी चीफ असीम मुनीर यांनी आतल्या आत कट रचायला सुरुवात केली आहे. एलओसीवर (नियंत्रण रेषा) पाक लष्कराच्या ८ ब्रिगेडने ३५ अँटी ड्रोन युनिट तैनात केले आहेत. लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई हल्ले रोखण्याचे काम करतील.Indus water
पाकने एआय फेन्सिंगही केले आहे. याअंतर्गत टार्गेटिंग आणि सर्व्हिलन्स वेगवान करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर ड्रोन ग्रिडही तयार केले आहे. पाकने अफगाणिस्तानला लागून असलेल्या आपल्या सीमेवरून ५ बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हलवून एलओसीच्या रावलाकोट, कोटलीमध्ये तैनात केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App