विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Athawale महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.Ramdas Athawale
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे सध्या जे बोलत आहेत, त्यातून त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातील मर्यादा दिसून येतात. मुंबईचा इतिहास आणि सामाजिक बांधणी समजून घेतल्याशिवाय अशी विधाने करणे योग्य नाही. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, पण तिचा गुजरातशी एक ऐतिहासिक आणि आर्थिक संबंधही आहे. आठवले पुढे म्हणाले की, शतकानुशतके मराठी आणि गुजराती समुदायांनी एकत्र येऊन मुंबई उभारली आहे. या दोघांच्या मेहनतीमुळेच हे शहर आज आर्थिक राजधानी बनले आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे हृदय आहे, पण त्याच वेळी ती भारताच्या सर्व भागांशी जोडलेली आहे. राज ठाकरेंनी हे समजून घेतले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी नक्कीच लढा दिला, पण त्यांनी कधीही मुंबईकडे संकुचित दृष्टीने पाहिले नाही. मराठी आणि गुजराती दोघेही मुंबईकर आहेत. हे शहर सर्वांचं आहे. आज राज ठाकरे जे करत आहेत ते फुटीर आणि संकुचित राजकारण आहे, जे मुंबईच्या आत्म्याला दुखावते.Ramdas Athawale
फक्त भाषणांनी नेतृत्व होत नाही, आठवले यांचा टोला
रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या भाषणशैलीवर टीका करताना म्हटले की, राज ठाकरे यांना व्यंग्यात्मक भाष्य करण्याची आणि लक्षवेधी भाषणे देण्याची कला अवगत आहे, पण यातून महाराष्ट्राला काही ठोस परिणाम मिळालेले नाहीत. जर त्यांना खरोखर महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही करायचे असेल, तर त्यांनी बहुजन विकास, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय अशा क्षेत्रांमध्ये काम करावं. केवळ घोषणा देऊन आणि वाद निर्माण करून महाराष्ट्राचे नेतृत्व करता येत नाही.
रामदास आठवले यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
आज राज ठाकरे जे करत आहेत त्यावरून मुंबईच्या इतिहासाची आणि तिच्या खोलीची त्यांना ओळखीची कमतरता असल्याचे दिसून येते. आपण हे विसरू नये की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, परंतु गुजरातशी त्याचा एक मजबूत ऐतिहासिक संबंध देखील आहे. शतकानुशतके, गुजराती आणि मराठी समुदायांनी एकत्रितपणे मुंबई बांधली आहे, ती आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केली आहे. हे शहर केवळ महाराष्ट्राचा अभिमान नाही, तर त्याचा एक भाग गुजरातशी देखील जवळून जोडलेले आहे. आज राज ठाकरे जे करत आहेत ते संकुचित आणि फुटीर राजकारण आहे, जे मुंबईच्या आत्म्याला दुखावत आहे.
बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेसाठी लढले, परंतु त्यांनी कधीही शहराकडे संकुचित दृष्टीने पाहिले नाही. येथे, गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर आहे.
राज ठाकरेंना भाषणे देण्याची कला आहे आणि व्यंग्यात्मक भाष्य करण्याची कला आहे, परंतु यातून कोणतेही ठोस किंवा रचनात्मक परिणाम मिळालेले नाहीत. जर त्यांना खरोखर महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही करायचे असेल तर त्यांनी आंबेडकरी चळवळ, बहुजन विकास आणि शैक्षणिक सुधारणा यासारख्या गंभीर मुद्द्यांवर काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नेतृत्व केवळ मोठ्याने केलेल्या विधानांनी आणि वादग्रस्त भाषणांनी करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App