केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देत पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. Big decision of the Union Cabinet Announcement of running 10 thousand new electric buses approval of Vishwakarma scheme
अनुराग ठाकूर म्हणाले की ई-बस सेवा योजनेवर सुमारे 57,613 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. याअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 57,613 कोटींपैकी भारत सरकार 20 हजार कोटी रुपये देणार आहे.
याशिवाय अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ही योजना 3 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये उपलब्ध असेल. या योजनेंतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर 10 हजार ई-बससह शहर बस संचालन केले जातील. ही योजना 10 वर्षांसाठी बस चालवण्यास मदत करेल.
कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पाच टक्के दराने –
याचबरोबर केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. मंत्रिमंडळाने 13 हजार कोटी रुपयांच्या विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. तसेच कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पाच टक्के दराने दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा योजनेचा 30 लाख कारागीर कुटुंबांना फायदा होणार आहे. याशिवाय 14,903 कोटी रुपये खर्च करून डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App