रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.Raksha Khadse criticizes Thackeray government; Said – “Declarations and speeches do not solve the problems of farmers”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य विरोधी पक्षांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप केलेले पाहायला मिळत आहे.तसेच राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.यावर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.
पुढे रक्षा खडसे म्हणाल्या की , ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App