मी जे करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून नाही; अशोक खरात प्रकरणावर एकनाथ शिंदेंचे उत्तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली.
“मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.
विरोधकांनी कुठलेही खोटे नॅरेटिव्ह पसरविले, तर त्या विरोधात कठोर भूमिका घ्या, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीत शिवसेनेच्या खासदारांना दिले.
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत रस्ते अपघातांमुळे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
Deputy CM Eknath Shinde facilitated the safe return of 164 Maharashtrians, including 84 students from Pune, who were stranded in the UAE due to the Iran-Israel war. Crediting PM Modi and Amit Shah for their leadership, Shinde coordinated two special flights from Fujairah to Mumbai to rescue citizens from Dubai and surrounding areas.
धुळवडीच्या सणानिमित्त प्रथेप्रमाणे आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले. पण एकनाथ शिंदे यांनीही धुळवड साधेपणाने साजरी केली.
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बंजारा समाजातील मान्यवरांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन आज गौरविले.
अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे सध्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत.
मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला.
एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोल्हापूरच्या कागल येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मत पेटीत नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विशेष सभा पार पडली.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली की मराठी माध्यमांनीच लांडगा आला रे ची घंटा पुन्हा वाजवली??, असा सवाल विचारायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या बातमीने आली.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सतत होणाऱ्या सुनावणीच्या पुढे ढकलण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळावर सरन्यायाधीशांचे स्वागत करतानाचे फोटो शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राऊत संतापले.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले.
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊतांची शिंदे सेनेत संशय पेरणी; पण ठाकरे आणि राऊतांच्या नादी लागून शिंदे करतील का आत्मघाती कृती??, असा सवाल समोर आलाय.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सोमवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेवर जोरदार पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी अदानीच्या मुद्द्यावरून गौतम अदानी यांची जिथे भाजपचे सरकार नाही या राज्यांमध्ये किती गुंतवणूक आहे, याची देखील आकडेवारी दाखवली. तसेच ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले, या कफन चोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार, असा इशारा देखील दिला.
आज तुम्ही म्हणताय, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्षांपूर्वी तुम्ही वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??, असा खोचक सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची शिवाजी पार्कवर पोलखोल केली.
बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतात, पण घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??, असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केला.