
- ‘अचानक परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारला लाज वाटावी’
विशेष प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्र आरोग्य विभागाची 25 व 26 सप्टेंबर रोजी होणारी भरती परीक्षा अचानक रद्द झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. यावर खा. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारावर कडाडून टीका केली आहे. Shame on the government for abruptly canceling exams’
पुढच्या परीक्षेसाठी सरकारने विद्यार्थ्यांना तिकिटाच्या पैशासह संपूर्ण भत्ता दिला पाहिजे खा. नवनीत राणा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतल्याने मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे
त्यांच्य तीन तिघाड़ी सरकार एक परीक्षा योग रीतीने घेवू शकत नाही अशी जोरदार टीका खासदार नवनीत राणा यांनी केली ,समोर ढकलण्यात आलेली परीक्षा ज्या वेळेत होईल त्या वेळी विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा खर्च सह राज्य शासनाने त्यांना वेगळ्या भत्ता द्यावा अशी मागणी खासदार यांनी केली.
- आरोग्य भरती परीक्षा अचानक रद्द
- परीक्षा रद्द झाल्याने खा. नवनीत राणा आक्रमक
- खा. राणा यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडकून टीका
- ‘तिघाडी सरकार एक परीक्षाही नीट घेऊ शकत नाही?’
- ‘शासनाने विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा खर्च द्यावा’
- खा. नवनीत राणा यांची जोरदार मागणी