विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवर जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी केली आहे. Priyanaka Vadra targets BJP
फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये वद्रा यांनी म्हटले आहे की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली असून त्यांच्या जवळचे लोक हेच यावर विश्वंस्त म्हणून काम करत आहेत.
लोकांकडून जमा करण्यात आलेला प्रत्येक पैसा श्रद्धास्थानाच्या उभारणीसाठी वापरला जावा त्याचा गैरव्यवहार होता कामा नये, ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असे प्रियांका यांनी म्हटले आहे. एखाद्याच्या श्रद्धेमध्ये देखील संधी शोधणे हा कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धास्थानावरील हल्ला असून ते एक मोठे पाप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App