राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे
म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.. यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला .म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे. राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार आहे.Mhada paper leaked : opened the eyes of the state government; Important decision taken! Now all the exams will be taken by MKCL – IBPS – TCS
म्हाडाच्या पेपरफुटीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अलिकडेच झालेल्या पेपरफुटीमुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला होता. या पेपरफुटीनंतर राज्य सरकारला म्हाडाच्या परीक्षा रद्द करव्या लागल्या होत्या .
या पेपरफुटीची सध्या चौकशी सुरू आहे. यात आणखी काही महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. यात पोलिसांनी काही संभाषणेही तपासली आहेत.
याआधीही पेपरफुटी
याआधीही अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अनेक विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटले होते.
त्यानंतर आरोग्य विभागाचे पेपर फुटल्याने कित्येक वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नुकसानाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने आज अखेर राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर इथून पुढे सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App