• Download App
    सोन्याची हॉलमार्क दागिने विक्री आजपासून बंधनकारक; व्यावसायिकांकडून स्वागत; पण मुदतीचीही मागणी sitename%Govt of India makes hallmarking on gold jewellery & other gold items mandatory from today

    सोन्याची हॉलमार्क दागिने विक्री आजपासून बंधनकारक; व्यावसायिकांकडून स्वागत; पण मुदतीचीही मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुवर्ण व्यावसायिकांवर सोन्याचे हॉलमार्क दागिने विक्री बंधनकारक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांवर शुध्दतेचा मार्क हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सुवर्ण व्यावसायिकांनी स्वागत केले असून बिगर हॉलमार्क दागिने विक्री करण्यासाठी मुदत देखील वाढवून मागितली आहे. Govt of India makes hallmarking on gold jewellery & other gold items mandatory from today

    सोन्याची शुध्दता पारखून त्यावर हॉलमार्कचे शिक्कामोर्तब करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टळते. दागिने देशभर कोठेही मोडीत काढले तरी त्याच्या शुध्दतेबाबत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.

    केंद्र सरकारच्या या निर्णयाचे दिल्ली, मुंबई आणि अन्य शहरांमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. सुवर्णकारांचा व्यवसाय विश्वासावर चालतो. शिवाय सध्याही हॉलमार्कशिवाय दागिने तयार आहेत. ग्राहकांचा कल असे दागिने खरेदी करण्याकडे देखील असतो. त्यामध्ये दराचा देखील फरक राहतो. त्यामुळे बिगर हॉलमार्क दागिने विक्रीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी काही सुवर्ण व्यावसायिक संघटनांनी केली आहे.

    जुने दागिने खरेदी – विक्रीसाठी परवानी राहणार आहेच. पण त्याचे हॉलमार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित सुवर्ण व्यावसायिकाची राहील. नवीन दागिने घडविताना हॉलमार्क गुणवत्ता राखण्याची देखील जबाबदारी सुवर्ण व्यावसायिकाची राहील, असे भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी सांगितले.

    Govt of India makes hallmarking on gold jewellery & other gold items mandatory from today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Donald Trump : इराणशी केलेल्या करारावरून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कडून G7 च्या व्यासपीठाचा वापर!!

    Jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली

    NEET Re-Exam 2026 : NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील; अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही