विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सामान्य लोकांना थोडा दिलासा मिळणार आहे, कारण खाद्यतेलाच्या किंमती खाली येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या एक महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती खाली येण्यास सुरूवात झाली असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. ही घट 20 टक्क्यांच्या आसपास आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारतातील खाद्यतेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल आहे . Good news …! Edible oil has become cheaper! See new rates for edible oils
तेलांच्या किंमती कमी झाल्या
एका अधिकृत निवेदनात म्हटले गेले आहे की,’ भारतातील खाद्यतेलाच्या किंमती वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये घसरणारा कल दर्शवित आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एक महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती खाली येत आहेत.’
उदाहरण देताना सरकारने सांगितले की, 7 मे रोजी पाम तेलाची किंमत 142 रुपये प्रतिकिलो होती आणि आता ती 19 टक्क्यांनी कमी होऊन 115 रुपये प्रति किलो झाली आहे, त्याचप्रमाणे सूर्यफूल तेलाची किंमतीत 16 टक्क्यांची घसरण होऊन 157 रुपये प्रतिकिलो आहे. 5 मे रोजी ती 188 रुपये होती. 20 मे रोजी सोया तेलाची किंमत 162 रुपये प्रति किलो होती आणि आता ती मुंबईत 138 रुपयांवर आली आहे.
मोहरीच्या तेलाचे दरही कमी झाले
मोहरीच्या तेलाच्या बाबतीत 16 मे 2021 रोजी प्रतिकिलो किंमत 175 रुपये होती. आता ते 10 टक्क्यांनी घसरून 157 रुपये प्रति किलो झाले आहे, ‘असे निवेदनात म्हटले आहे. 14 मे रोजी शेंगदाणा तेलाची किंमत 190 रुपये प्रतिकिलो होती, ती आता 174 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. 2 मे रोजी वनस्पती तेलाची किंमत 154 रुपयांवरून आठ टक्क्यांनी घसरून 141 रुपयांवर आली आहे.
किंमती कमी करण्यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे खाद्यतेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि देशातील तेलबियांच्या उत्पादनावरही अवलंबून असतात, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. भारतात याचा उत्पादनापेक्षा वापर जास्त आहे. यामुळे भारत सरकारला खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी आयातीवर बराच खर्च करावा लागतो. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार मध्यम आणि दीर्घकालीन उपायांवर काम करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App