• Download App
    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन | The Focus India

    शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी 
    मुंबई : शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
    तुम्हाला जीवनावश्यक सुविधा पुरवायला शासन कटिबद्ध आहे. यातून नवे वाद होतील, प्रशासनावर ताण निर्माण होईल. माझी विनंती आहे आपण धावपळ करून गावाकडे जाण्याचा प्रयत्न टाळावा, असे थोरात यांनी सांगितले.
    ते म्हणाले की, शहरातील नागरिक गावाकडे आल्याने काही ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होतेय. गावकरी बांधवांना माझी विनंती आहे आपण काळजी घ्या मात्र कायदा हातात घेऊ नका, पोलिसांचे काम पोलिसांना करू द्या!

    Related posts

    पेट्रोलही चालेल, इथेनॉलही! मारुतीची देशातील पहिली फ्लेक्स-फ्युएल वॅगनआर सादर; इंधन खर्चात मोठी बचत होणार

    Annamalai यांनी भाजप सोडल्याचा तमिळनाडूत पहिला फटका; भाजपच्या युवा नेत्याचाही लगेच राजीनामा; इतर नेत्यांना पक्षसंघटना वाचवायची चिंता!!

    Robin Khud : मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीची भारतात तब्बल ३००००० कोटींची गुंतवणूक!!, मोदींच्या भेटीत फैसला!!