“जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. YOGI ADITYANATH: When Hindu’s house burns, Muslim’s house will be a little safer: Yogi Adityanath
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : “दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील.
आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
“दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील. आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीत उत्तर प्रदेश जळत होता’ “1990 मध्ये काँग्रेस विरोधातील विविध पक्षांची सत्ता आली. त्यावेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचं पाप समाजवादी पक्षाने केलं. फक्त 1990 सालीच नाही नंतर जेव्हा-जेव्हा समाजवादी पक्षाला संधी मिळाली तेव्हा कोणताही व्यक्ती स्वत:ला सुरक्षित समजत नव्हतं.सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीमध्ये उत्तर प्रदेश जळत होता. आज आम्ही बोलू शकतो की, आम्ही उत्तर प्रदेशला दंगामुक्त केलं”, असा दावा योगींनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App