प्रतिनिधी
नवी दिल्ली :भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टुडू यांनी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना ‘दरोडेखोर’ म्हटले आहे. ओडिशातील भाजप नेत्याच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. ओडिशातील मयूरभंज येथील भाजप नेत्याने बालासोर जिल्ह्यातील बालियापाल येथील सरकारी शाळेत हे वक्तव्य केले.Union Minister Bishweshwar Tudu’s Controversial Statement Officers who join the service through UPSC are robbers
कोंबडी चोराला शिक्षा होते, पण खाण माफियांना नाही
केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी ओडिशातील बालियापाल येथील सरकारी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सांगितले की, कायदा अगदी ‘कोंबडी चोरा’लाही शिक्षा देतो. पण जो अधिकारी खाण माफिया बनतो, त्याला कोणी हातही लावू शकत नाही, कारण यंत्रणा त्याला संरक्षण देते. आदिवासी कार्य आणि जलशक्ती राज्यमंत्री टुडू हे शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते.
बिश्वेश्वर टुडू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल
कार्यक्रमानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की UPSC द्वारे नियुक्त केलेले अनेक अधिकारी ‘दरोडेखोर’ आहेत. तथापि, आम्ही या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. टुडू म्हणाले की, यूपीएससीच्या माध्यमातून भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे उच्च दर्जाचे ज्ञान असते, असे मला वाटत होते. म्हणूनच ते नेहमीच उच्च पदांवर विराजमान असतात. पण, आता माझी समजूत बदलली आहे.
UPSC मधून नियुक्त झालेले बहुतांश अधिकारी ‘दरोडेखोर’
टुडू म्हणाले की, आता मला वाटते की तेथून जाणारे बहुतेक लोक दरोडेखोर आहेत. मी असे म्हणत नाही की 100 पैकी 100 अधिकारी असे आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक असे आहेत. दरम्यान, UPSC ही एक स्वायत्त संस्था आहे, जी उच्च सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करते. हे सुशिक्षित अधिकारी असतानाही आपल्या देशात एवढा भ्रष्टाचार आणि अन्याय का, असा सवाल केंद्रीय मंत्री टुडू यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App