विशेष प्रतिनिधी
पणजी : राष्ट्रीय राजकारणात एकमेंकांचे मित्र असलेल्या अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात गोवा निवडणुकीवरून हमरीतुमरी सुरू झाली आहे. तृणमूल कॉँग्रेसला खूप महत्व देण्याचे कारण नाही कारण त्यांच्याकडे गोव्यात एक टक्काही मते नाहीत, असे टीकास्त्र केजरीवाल यांनी सोडले आहे.There is no reason to give too much importance to TMC, they don’t have even one per cent votes in Goa, Criticism of Arvind Kejriwal
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार तयारी केली आहे. पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, मला वाटते तुम्ही लोक टीएमसीला खूप महत्त्व देता.
मला वाटतं टीएमसीकडे आत्तापर्यंत 1% मतही नाही. ते फक्त 3 महिन्यांपूर्वी गोव्यात आले होते, लोकशाही अशी चालत नाही. तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे, तुम्हाला लोकांमध्ये काम करण्याची गरज आहे.
तुम्ही टीएमसीला खूप महत्त्व द्याल परंतु मला वाटत नाही की ते शर्यतीत कुठेही उभे आहे. केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींना त्यांची मोठी बहिण असे म्हटले आहे. ते म्हणाले, ममता माझ्याविरुध्द निवडणूक लढल्या किंवा त्यांनी मला थप्पड मारली तरी मी त्यांचा आदर करणे थांबवणार नाही. विरोधी पक्षाचे नेतृत्व कोण करतो याच्याशी मला संबंध नाही, परंतु आपल्या देशाने हे केले पाहिजे.
सध्या गोव्यात आम आदमी पक्ष आणि तृणमूल आमनेसामने आले आहेत. मात्र, बॅनर्जी आणि केजरीवाल यांचे आत्तापर्यंत खूपच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) अनिल बैजल यांच्यावर दिल्लीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत जून 2018 मध्ये केजरीवाल त्यांच्या मंत्र्यांसोबत धरणे आंदोलन करत होते,
तेव्हा बॅनर्जी केंद्र सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या. दोघांनी एकमेकांच्या निवडणूक रॅलींमध्येही भाग घेतला आहे आणि अनेक प्रसंगी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App