वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसांत आणखी एक आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार होता. याची प्रचिती भारतीय लष्कराला मिळाली होती. सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानींसह तीन दहशतवाद्यांना ठार करून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. हा खुलासा माजी चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केजेएस ढिल्लन यांनी त्यांच्या ‘कितने गाजी आये, कितने गाझी गए’ या पुस्तकात केला आहे.Second attack to happen within 10 days after Pulwama Retired commander claims security forces averted by killing Pakistani terrorists
पुस्तकात ढिल्लन लिहितात की, लोकांना अशा अनेक आत्मघातकी हल्ल्यांची माहिती नाही, ज्यांची योजना फेब्रुवारी 2019 मध्येच करण्यात आली होती. आत्मघाती हल्ल्याचा हेतू स्पष्ट करण्यासाठी एका दहशतवाद्याने स्फोटके आणि इतर शस्त्रे दाखविणारा व्हिडिओ बनवला होता. या इनपुटच्या आधारे सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करून त्यांचा डाव हाणून पाडला होता.
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर ‘लोकांच्या मनात शंका’, संजय राऊत म्हणाले- पीएम मोदी, संरक्षणमंत्र्यांनी त्या दूर केल्या पाहिजेत!
14 फेब्रुवारी 2019 ला झाला होता पुलवामा हल्ला
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे हल्ला झाला होता. यामध्ये एका आत्मघाती हल्लेखोराने आपले वाहन सीआरपीएफच्या ताफ्याच्या बसला धडकवले. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.
ढिल्लन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की- पुलवामा घटनेनंतर गुप्तचर संस्था, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने त्यांच्या कारवाया तीव्र केल्या होत्या आणि दक्षिण काश्मीर भागात जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कमध्ये घुसखोरी करण्यात बरीच प्रगती केली होती.
शौर्य चक्राने सन्मानित
या पुस्तकात 34 आरआरच्या नायब सुभेदार सोमबीर यांच्या शौर्याचेही कौतुक करण्यात आले आहे. सोमबीर यांनी पाकिस्तानी दहशतवादी ओसामाला समोरासमोर गोळीबारात ठार केले आणि स्वतः शहीद झाले. डीएसपी ठाकूर आणि नायब सुभेदार सोमबीर या दोघांनीही या कारवाईत वीरमरण आले. दोघांनाही शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App