डिजिटल इंडिया विधेयकावर संबंधितांशी सल्लामसलत या महिन्यात सुरू होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासावर भाष्य केले. ते म्हणाले की 2014-15 मध्ये अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा 3.5 टक्के होता, तो आज 10 टक्के झाला आहे. ते 2025-26 पर्यंत 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यासोबतच चंद्रशेखर म्हणाले की 2025-26 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे आमचे लक्ष्य आहे. New Digital Personal Data Protection Bill to be introduced in Parliament soon Rajeev Chandrasekhar
ते म्हणाले की 2014 मध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा डिजिटली अनकनेक्टेड देश होतो. ते म्हणाले की यूपीए सरकारने आयटी कायद्यात सुधारणा करून बड्या टेक कंपन्या आणि सोशल मीडिया कंपन्यांना प्रतिकारशक्ती दिली होती. ते म्हणाले की 2014 मध्ये आम्हाला टॉक्सिक इंटरनेट प्रणाली मिळाली. याशिवाय, राजीव चंद्रशेखर यांनीही काही महत्त्वाची माहिती एनडीटीव्हीशी शेअर केली. ते म्हणाले की डिजिटल इंडिया विधेयकावर संबंधितांशी सल्लामसलत या महिन्यात सुरू होईल.
ते म्हणाले की नवीन ’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाईल. आज आम्ही इंटरनेट खुले, सुरक्षित आणि डिजिटल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर उपक्रम सुरू केला आहे. आज भारत हा जगातील सर्वात मोठा कनेक्टेड देश आहे आणि आम्हाला भारताला सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह देश बनवायचा आहे. डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल लवकरच संसदेत मांडण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App