मागासवर्ग आणि त्यांच्या हक्कांबद्दल बोलतात, पण प्रत्यक्षात समर्थन करत नसल्याचाही आरोप केला आहे.
विशेष प्रतिनिधी
बिलासपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बिगरभाजपशासित राज्यांच्या सरकारांवर निशाणा साधला आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे मंगळवारी (१३ जून) नड्डा म्हणाले की, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि पंजाबमधील सरकारे ओबीसींच्या घटनात्मक अधिकारांचे सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. Naddas criticism of non BJPruled state governments over OBC reservation
ते म्हणाले की, ही सरकारे जात जनगणनेच्या बाजूने आहेत. हे पक्ष मागासवर्ग आणि त्यांच्या हक्कांबद्दल बोलतात, पण प्रत्यक्षात ते समर्थन करत नाहीत. बिहारचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की त्यांनी जात जनगणना सुरू केली, परंतु ओबीसी समुदायांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले. तसेच, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा (एनसीबीसी) हवाला देत नड्डा म्हणाले की, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान आणि पंजाबची सरकारं, जी ओबीसींना अनुकूल असल्याचा दावा करतात, त्यांच्या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अधिकारांवर गदा आणतात.
याचबरोबर नड्डा यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मुस्लिमांची बाजू घेत असल्याचा आरोप केला. बंगालमध्ये आरक्षणाचा लाभ मिळविणाऱ्यांपैकी ९१.५ टक्के लोक मुस्लिम आहेत तर इतर मागासवर्गीय यापासून वंचित आहेत. असं त्यांनी सांगितलं.
नड्डा म्हणाले की, पंजाबमध्ये ओबीसींचा कोटा 25 टक्के आहे, परंतु 12 टक्के ओबीसी समुदायांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे, तर राजस्थानमधील सात जिल्हे आदिवासी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ओबीसींचा कोटा आहे तेथे आरक्षण नाही. यावेळी त्यांनी एनसीबीसीला आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन केले. नड्डा पुढे म्हणाले की ही बिगर भाजपाशासित राज्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्याशी भेदभाव करत आहेत कारण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App