विशेष प्रतिनिधी
पणजी : काँग्रेस गोव्याला आपल्या शत्रूप्रमाणेह् वागणूक देत आला असून तीच वागणूक आताही सुरू आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवले असते, तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी गोवा काही तासांतच स्वतंत्र झाला असता; मात्र पोतुर्गीज राजवटीतून मुक्त होण्यास राज्याला १५ वर्षे लागली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्ला चढवला.If Nehru had decided to treat Goa as a permanent enemy of Congress, Goa would have become independent in a few hours after independence, alleges Goa, Prime Minister Narendra Modi
गोव्यातील मापुसा येथे प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, गोव्याची राजकीय संस्कृती आणि गोव्याच्या युवकांच्या आकांक्षा काँग्रेस कधीही समजू शकला नाही. गोव्याबाबत त्यांची नेहमीच शत्रुत्वाची भावना राहिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला ही गोष्ट अनेकांना ठाऊक नाही. भारताजवळ बलवान लष्कर आणि सशक्त नौदल होते. या ताकदीच्या आधारे काही तासांतच गोव्याचे स्वातंत्र्य साध्य झाले असते, मात्र काँग्रेसने १५ वर्षे काहीच केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App