विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाकाळात नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता केंद्र सरकार धावून आले असून या कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंतचा भविष्यनिर्वाह निधीचा हप्ता आता सरकारकडूनच भरण्यात येणार आहे. Govt will pay PF of lakhs of people
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये ज्यांनी नावनोंदणी केली आहे अशा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या या नव्या योजनेचा लाभ मिळू शकेल.
मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून याचा दूरगामी परिणाम रोजगार निर्मितीवर देखील झाला आहे. ज्यांच्यावर नोकऱ्या गमावण्याची वेळी आळी अशा कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंतचा भविष्यनिर्वाह निधीचा संपूर्ण हप्ता आता केंद्र सरकार भरणार आहे.
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे २५००० किंवा त्यापेक्षा जास्त मजूर- कामगार आपल्या मूळ स्थानी परतले असतील तर त्यांना त्यांच्या गावात केंद्र सरकारच्या १६ योजनांचाही लाभ मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App