विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. असे लक्षात येते अनेकांना अद्यापही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांच्यामधील फरक, त्यांचे महत्त्व समजत नाही. Do you know difference between 15 August and 26 January?
• पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस आहे. कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ जानेवारी १९५० रोजी देशात राज्यघटना स्थापन झाली. म्हणजे हा देश प्रजासत्ताक (प्रजेची सत्ता) असलेला देश झाला.
• १५ ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सलामी स्वीकारताना देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद.
• १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर…२६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.
• १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.तर… २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच; पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
• १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App