प्रतिनिधी
बंगळुरू : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, ओवेसी यांनी बुधवारी (३ मे) भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. जमखंडी येथील जाहीर सभेत ते म्हणाले की, भाजपचेच आमदार भाजपमध्ये गेल्याने भाजप पुन्हा सत्तेत येण्यामागे काँग्रेस आहे.Asaduddin Owaisi said in the Karnataka Assembly, ‘I have great respect for Chhatrapati Shivaji Maharaj, because…’
खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांचा विवेक विकला गेल्याने भाजप सरकार स्थापन झाले. काँग्रेसला सवाल केला तर ते मलाच जबाबदार धरत आहेत.” ते पुढे म्हणाले की, भारतात दलित आणि मुस्लिमांना त्रास होत असेल तर त्यामागे केवळ काँग्रेस आहे.
ओवेसी म्हणाले की, यूएपीए कायद्यानुसार मुलांना प्रत्येकी तीन वर्षे तुरुंगात ठेवून सडवले जाते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यूएपीए कायद्याबाबत भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले होते. तुम्हीच भाजपला साथ दिली होती आणि आज तुम्ही मोठमोठ्या बाता मारत आहात.
पीएम मोदींचा केला उल्लेख
ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मला शिवीगाळ केली जाते. मात्र जमखंडी येथे एकही सरकारी रुग्णालय नाही. पण पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत. तुम्ही आमचे उमेदवार सुशील कुमार यांना मत द्या, रुग्णालय बांधले जाईल, असा दावा त्यांनी केला.
ओवेसी म्हणाले की, जमखंडीमध्ये पिण्याचे पाणी नाही हे तुम्ही पाहत आहात. पाणी प्यावे लागेल. तुम्ही 10 मेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला पाणी पाजा आणि मग बघा 13 मेला लोकांना पिण्याचे पाणी मिळू लागेल.
टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख
टिपू सुलतानची मिरवणूक निघत नाही हे दिसत असले तरी आम्ही ती काढू असे ओवेसी म्हणाले. असे अनेक मुद्दे आहेत. 2021 साली ईदच्या दिवशी मुलांना अटक करून 40 दिवसांनंतर सोडण्यात आले, पण काँग्रेसचे आमदार त्यांना लाडू खाऊ घालण्यासाठी थांबले होते. ते म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो कारण ते मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. पण इकडे भाजप मात्र अजेंडा राबवत आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App