नाशिक : जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली. त्यामुळे या चार सीमावर्ती राज्यांमध्ये आज वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे, पण mock drill जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्ष पार पडेपर्यंत अनेकांनी “कुछ बडा होने वाला है” असा आदमास बांधून तशी ट्विट सोशल मीडियावर केली. काहींनी व्हिडिओ शेअर केले. काहींनी लेख लिहून काही विशेष अंदाज व्यक्त केले, पण “कुछ बडा होने वाला है” या अंदाजांमध्ये भारतीय संरक्षण व्यवस्थेच्या विशिष्ट चौकटी पलीकडे जाऊन फारसे अंदाज व्यक्त झालेले दिसले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी operation sindoor दरम्यान पाकिस्तानशी संबंध ठेवताना new normal policy जाहीर केली आणि ती प्रत्यक्ष अंमलात देखील आणली. या new normal policy मध्ये त्यांनी जाहीरपणे तीन बाबी सांगितल्या आणि त्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रिपीट केल्या.
– या तीन बाबी म्हणजे
1. भारत इथून पुढे दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे आका यांना वेगवेगळे मानून वेगवेगळी treatment देणार नाही. त्यांना एकच treatment देईल.
2. पाकिस्तानशी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करणे आणि दहशतवाद थांबविणे या मुद्द्यांवरच चर्चा होईल.
3. पाकिस्तानने पुढचा कुठलाही दहशतवादी हल्ला केला, तर त्यांना operation sindoor च्या पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त प्रखरतेने प्रत्युत्तर दिले जाईल.
पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत किमान पाच ते सात वेळा हा इशारा पाकिस्तानला देऊन झाला. त्याचबरोबर अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांना भारत घाबरणार नाही हे देखील तितक्याच वेळा सांगून झाले.
पण जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या सीमा वरती राज्यांमध्ये आज होणाऱ्या mock drill च्या पार्श्वभूमीवर जी अनेक तज्ञांनी “कुछ तो बडा होने वाला है” अशी भाकिते वर्तवली, त्यातून भारत इथून पुढच्या कारवाईसाठी खरंच दहशतवादी हल्ल्याची वाट बघत बसेल का??, हा सवाल तयार झाला आहे.
– दहशतवाद्यांची डोकी बिळातून वर
पाकिस्तान मध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा बिळातून डोके वर काढून पाकिस्तान मधल्या कसूरमध्ये आणि अन्य शहरांमध्ये मोठमोठे मेळावे घेतले. त्यामध्ये सैफुल्ला कसुरी याच्यासह हफीज सईदचा मुलगा तलाह सईद, अमीर हमजा देखील स्टेजवर दिसला. त्याच स्टेजवर पाकिस्तानचे मंत्री त्या कार्यक्रमात सामील झाले. दहशतवाद्यांच्या मेळाव्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ते मुद्दामून व्हायरल केले गेले. आत्तापर्यंत पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे “फेमस” नव्हते, पण भारताने कारवाई केल्यानंतर ते जास्त “फेमस” झाले अशी दर्पोक्ती सैफुल्लाने केली. भारताविरुद्ध त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सगळ्या दहशतवाद्यांनी जिहादचा पुन्हा नारा दिला.
– बिळातून आलेत बाहेर, तर ठोका!!
हा सगळा प्रकार भारताला उचकवण्यासाठीच होता. एकीकडे पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर त्याची red line ओलांडू देणार नाही, अशी दमबाजी केली आणि दुसरीकडे दहशतवाद्यांनी कसूर आणि अन्य शहरांमध्ये मेळावे घेतले. यातून त्यांनी भारताला उकसवले. आता जेव्हा भारतामध्ये अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नवा भारत पुढच्या कारवाईसाठी एखाद्या नव्या दहशतवादी हल्ल्याची वाट पाहत बसणार का??, हा यातला कळीचा सवाल आहे. की mock drill च्या इशाऱ्यातून पाकिस्तानी दहशतवादी हल्ला करोत किंवा न करोत, ते बिळातून बाहेर आलेत ना, तर त्यांना आहे, त्या जागीच ठोकण्याचा कुठला इरादा अंमलात आणणार का??, हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. कारण operation sindoor च्या पहिल्या टप्प्यात भारताने कसूर नावाच्या शहरावर कुठली कारवाई केल्याची बातमी आली नव्हती. याचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App