इस्रायल-पॅलेस्टाईनबाबत भारताची भूमिका काय आहे? परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट, म्हटले…

भारताने इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना  सुखरूप  परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय  सुरू केले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनबाबत भारताच्या भूमिकेबाबत उत्तरे दिली आहेत. ते म्हणाले की, आत्तापर्यंत इस्रायलकडून शस्त्रांची मागणी आलेली नाही आणि आम्ही कोणतीही मदत करत नाही. यावेळी भारताचे लक्ष इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुरक्षितपणे सुटका करण्यावर आहे. What is Indias position on Israel Palestine The Ministry of External Affairs clarified

पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी बुधवारी जाहीर केल्यानुसार, इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आमच्या नागरिकांना परत येण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे.

इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना, नेतान्याहू मंत्रिमंडळाने हमासला संपवण्याची घेतली शपथ!

भारतीय नागरिकांना घेण्यासाठी पहिले चार्टर फ्लाइट गुरुवारी रात्री तेल अवीवला पोहोचेल आणि शुक्रवारी सकाळी भारतात परतण्याची शक्यता आहे. या विमानात 230 प्रवासी बसण्याची शक्यता आहे. आमच्याकडे सर्व पर्याय आहेत.

इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्या केरळच्या महिलेबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. त्या रूग्णालयात असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

What is Indias position on Israel Palestine The Ministry of External Affairs clarified

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात