चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Chenab Railway पंतप्रधान मोदी चिनाब रेल्वे पुलावरून काश्मीरला जोडणाऱ्या रेल्वेला ६ जून रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर चिनाब रेल्वे पुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.Chenab Railway
त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की ६ जून रोजी या पुलावरून काश्मीरसाठी रेल्वे धावण्यास सुरुवात होईल. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, इतिहास रचला जाणार आहे. फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, शक्तिशाली चिनाब पूल, जम्मू आणि काश्मीरमध्ये उभा आहे. तो उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) चा भाग आहे. तो निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून २०२५ रोजी चिनाब पुलाचे उद्घाटन करतील. जे नवीन भारताच्या ताकदीचे आणि दूरदृष्टीचे अभिमानास्पद प्रतीक आहे.
चिनाब पुलाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
१२५० कोटी रुपये खर्चाचा हा पूल चिनाब नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंच असेल आणि पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असेल. एवढेच नाही तर हा रेल्वे पूल रिश्टर स्केलवर ८ रिश्टर स्केलचा भूकंप आणि उच्च तीव्रतेचा स्फोट देखील सहन करू शकेल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, संभाव्य दहशतवादी धोके आणि भूकंपांसाठी सुरक्षा व्यवस्था देखील यात आहे. पुलाची एकूण लांबी १३१५ मीटर आहे.
अशा प्रकारे USSBRL प्रकल्प पूर्ण झाला –
२००९ मध्ये, पहिला ११८ किमी (बारामुल्ला-काझीगुंड) पूल बांधण्यात आला, जिथे DMUs चालतात. हा ट्रॅक काश्मीरमध्येच येतो. ऑक्टोबर २००९ मध्येच त्याचे उद्घाटन करण्यात आले. २०१३ मध्ये, काश्मीर आणि जम्मू विभागांना जोडण्यासाठी १८ किमी (काझीगुंड-बनिहाल) साठी एक ट्रेन सुरू करण्यात आली. डीएमयू इथपर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर, उधमपूर ते कटरा पर्यंत २५ किमीसाठी वंदे भारतसह अनेक ट्रेन सुरू करण्यात आल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App