वृत्तसंस्था
लखनौ : लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांचे भीषण सत्य मांडणारा सिनेमा “द केरल स्टोरी”वर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातल्यानंतर या बंदीला उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार चपराक लगावली आहे. “द केरल स्टोरी” सिनेमा त्यांनी उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केला आहे. लव्ह जिहादच आणि दहशतवाद यांचे भीषण वास्तव सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघावे, अशी आमची धारणा असल्याने मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात हा “द केरल स्टोरी” हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजपचे कार्यकर्ते हिंदू समाजासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनाचे सामूहिक मोफत आयोजन करीत आहेत. The Kerala Story : Yogis clapped in Uttar Pradesh over Mamata’s ban in Bengal; Cinema Tax Free!!
“द केरल स्टोरी” सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातल्यानंतर त्या बंदी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा इरादा सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी व्यक्त केला आहे.
मुसलमानांकडून हिंदू मुलींचे होत असलेल्या धर्मांतराचा भांडाफोड करणाऱ्या “द केरल स्टोरी” या चित्रपटाला भारतभर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावत असलेल्या या चित्रपवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र मुस्लिमांच्या लांगूलचालनामुळे चित्रपटावर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोत्या विचारसरणीचा आता सगळीकडून निषेध होत आहे. “द काश्मीर फाईल्स”चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली, तर चित्रपटाचे निर्माता विपुल शाह बंगाल सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
“द काश्मीर फाईल्स” म्हणजे काय? हा चित्रपट एका समूदायाचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरल स्टोरी’ म्हणजे काय?… ही विकृत कथा आहे, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी, माझ्याबद्दल बोलत आहेत, असा माझा अंदाज आहे. होय, मी बंगालमध्ये खिलाफतने भडकावलेल्या डायरेक्ट अॅक्शन डे नरसंहारातून वाचलेल्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो. तुम्ही का घाबरताय? “द काश्मीर फाइल्स” हा नरसंहार आणि दहशतवादाबद्दलचा होता. काश्मिरी लोकांची बदनामी होते, असे तुम्हाला कशाच्या आधारावर वाटत आहे? एखाद्या राजकीय पक्षाकडून चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी दिला जातो, असे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? मी तुमच्याविरुद्ध मानहानीचा खटला आणि नरसंहार नाकारण्याचा खटला का दाखल करू नये? तुम्ही ज्याबद्दल बोलताय त्या चित्रपटाला “द दिल्ली फाइल्स” म्हणतात “बंगाल फाईल्स” नाही आणि कोणीही मला गप्प करू शकत नाही, असे विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तर “द केरल स्टोरी” चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनीही ममता बॅनर्जी यांनी आमच्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊन लढू, असा इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App