विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची किंमत एक मुस्लिम महिलेला चुकवावी लागत आहे. ह भाजपला मतदान केल्यामुळे पतीने घराबाहेर काढल्याची तक्रार महिलेने पोलिसांत केली आहे. आता या महिलेचा पती तिला तिहेरी तलाक देण्याची धमकी देत आहे.Punishment of a Muslim woman who supported BJP , her husband kicked her out of the house
या महिलेने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उत्तर प्रदेशच्या डीजीपींना पत्र लिहिले आहे. यामध्ये आरोपी पतीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा सात दिवसांत अहवाल मागवला आहे.
बरेलीतील एजाजनगर गौंटिया येथील रहिवासी असलेल्या उज्माने सांगितले की, वर्षभरापूर्वी तिचा तस्लीम अन्सारीसोबत निकाल झाला होता. मतदानाच्या दोन दिवस आधी 14 फेब्रुवारी रोजी महिलेचे पती तस्लीम अन्सारी यांचे मामा तैयब आले होते. त्यांनी सपा उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी भाजपला मतदान केले.
यामुळे पती आणि तैयब संतापले. तू भाजपला मत का दिले असा सवाल त्यांनी केला. यावर महिलेने सांगितले की, भाजपने महिलांना तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य दिले, म्हणूनच मी भाजपला मतदान केले. यानंतर पती तस्लीम अन्सारी संतापला आणि पत्नीला घरातून बाहेर हाकलले. पती म्हणाला की, बघ, आता तुला तलाकपासून कोण वाचवतो?
उज्मा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कँट येथील उमेदवाराला मतदान केले. पती तस्लीम अन्सारी आणि त्यांचे मामा तैयब हे सपा उमेदवाराला पाठिंबा देत होते. यामुळे संतापलेल्या पती तस्लीमने आता पत्नीला धक्के मारून घराबाहेर हाकलून दिले आहे. पत्नीने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण सासरचे लोक तयार झाले नाहीत.
उज्मा यांनी सांगितले की, त्या स्वत: दोन्ही कुटुंबांशी बोलून पुढील कारवाई करतील. तिहेरी तलाकशी संबंधित प्रकरणे हाताळणाºया ‘मेरा हक’ या फाउंडेशनच्या फाउंडेशनचे अध्यक्ष फरहत नक्वी यांची भेट घेऊन त्यांना न्यायाचे आवाहनही केले आहे. इन्स्पेक्टर बारादरी नीरज मलिक यांनी सांगितले की, उज्माच्या तक्रारीवरून तिचा पती तस्लीम, मामा तैयब आणि इतरांविरुद्ध छळ, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या धोरणांवर समाधानी असल्याचे उज्मा यांनी सांगितले. भाजपने महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्ती दिली. कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था केली. या सर्वांवर खुश होऊन त्यांनी विधानसभेत भाजपला मत दिले. यामुळे तिच्या सासरची मंडळी संतापली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App