वृत्तसंस्था
मुरादाबाद : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील धन्यवाद प्रस्तावावर केले होते. त्याला आज संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह यांनी मुरादाबाद मध्ये प्रत्युत्तर दिले आहे.Prime Minister Pandit Nehru ceded the Shakespeare Valley to China; Rajnath Singh’s reply to Rahul Gandhi
हिमालयाच्या पर्वत रांगांमधील शाक्सगाम खोरे हे पंडित नेहरूंनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात चीनला देऊन टाकले हे राहुल गांधी विसरले आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी त्या पुढे जाऊन दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर देखील ताशेरे ओढले. चीन जेव्हा काराकोरम मध्ये महामार्ग बनवत होता तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी मला त्यावेळी अजिबात विरोध केला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
- Vijay Diwas 2021 : आज ५०वा विजय दिवस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून शूर जवानांच्या शौर्याचे स्मरण
काँग्रेसच्या नेत्यांना जनतेची दिशाभूल करण्याची फार जुनी सवय आहे. खोटी आणि चुकीची माहिती दडपून सांगणे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे, अशा शेलक्या शब्दांत मध्ये राजनाथसिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून राहुल गांधींचे वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या चूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Prime Minister Pandit Nehru ceded the Shakespeare Valley to China; Rajnath Singh’s reply to Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : असदुद्दीन ओवैसींच्या कारवर गोळीबार, मेरठहून परतत असताना कारवर 4 राऊंड फायर करून पळून गेले हल्लेखोर
- पंडित नेहरूंचेच परराष्ट्र धोरण चीन धार्जिणे; काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंहांचा हल्लाबोल!!
- Budget Session : मराठीला लवकरच मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
- एटीएसने अपहरण केले; हिंदुत्ववाद्यांविरुध्द दबाव आणला मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार उलटला