• Download App
    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- '15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!' । pm narendra modi launches 7 new defence companies as conversion of odinance factory board in new entities

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    7 new defence companies : विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 7 नवीन संरक्षण कंपन्या समर्पित केल्या आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या जागी स्थापन करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी ते म्हणाले, “7 नवीन कंपन्यांचा हा शुभारंभ देशातील 41 आयुध कारखान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी संकल्प यात्रेचा भाग आहे. ते म्हणाले की, हे काम गेली 15-20 वर्षे प्रलंबित होते. मला खात्री आहे की, येत्या काळात या सर्व सात कंपन्या भारताच्या लष्करी सामर्थ्याचा प्रमुख आधार बनतील. pm narendra modi launches 7 new defence companies as conversion of odinance factory board in new entities


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 7 नवीन संरक्षण कंपन्या समर्पित केल्या आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या जागी स्थापन करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी ते म्हणाले, “7 नवीन कंपन्यांचा हा शुभारंभ देशातील 41 आयुध कारखान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी संकल्प यात्रेचा भाग आहे. ते म्हणाले की, हे काम गेली 15-20 वर्षे प्रलंबित होते. मला खात्री आहे की, येत्या काळात या सर्व सात कंपन्या भारताच्या लष्करी सामर्थ्याचा प्रमुख आधार बनतील.

    पंतप्रधान म्हणाले की, हा उपक्रम देशाच्या लष्करी सामर्थ्याचा आधार बनेल. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर ते अपग्रेड करणे आवश्यक होते जे केले गेले नाही. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सात वर्षांत सरकारने लष्करी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या सुधारणा होत आहेत.

    कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पीएम मोदी म्हणाले की, कोरोनाच्या कठीण काळानंतर आपली अर्थव्यवस्था ज्या वेगाने रिकव्हर झाली आहे, त्याविषयी संपूर्ण जगाला भारताबद्दल आशा आहे. ते म्हणाले की अलीकडेच एका जागतिक संस्थेने असेही म्हटले आहे की, भारत पुन्हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार आहे.

    पंतप्रधान म्हणाले की, या वर्षी भारताने स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात देश नवीन भविष्य घडवण्यासाठी नवीन संकल्प घेत आहे आणि दशकांपासून अडकलेली कामे पूर्ण करत आहे. पंतप्रधान म्हणाले, “जागतिक महायुद्धाच्या वेळी जगाने भारताच्या आयुध कारखान्यांची ताकद पाहिली आहे. आमच्याकडे उत्तम संसाधने, जागतिक दर्जाची कौशल्ये होती. स्वातंत्र्यानंतर, आम्हाला या कारखान्यांना अपग्रेड करण्याची गरज होती, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे होते पण ते याकडे जास्त लक्ष देण्यात आले नाही.”

    पंतप्रधान म्हणाले, “आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत, भारताला स्वतःची जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे, भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास करणे हे देशाचे ध्येय आहे. गेल्या सात वर्षांत देशाने ‘मेक इन इंडिया’ मंत्राचे पालन केले आहे. आम्ही हा संकल्प पुढे नेण्यासाठी तुमच्यासोबत काम केले आहे.”

    pm narendra modi launches 7 new defence companies as conversion of odinance factory board in new entities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bajrang Dal : उमरखेडमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

    BHAVY Yojana : केंद्र सरकारने भव्य योजना सुरू केली; देशभरात 100 औद्योगिक उद्याने तयार केली जातील; ₹33,660 कोटींचे बजेट मंजूर

    योगींचा कायद्याचा बडगा; उत्तर प्रदेशात बकरी ईदच्या कुर्बानीला सार्वजनिक ठिकाणी बंदी; रस्त्यावरचे नमाज पठण बंद म्हणजे बंद!!