• Download App
    भारत आणि श्रीलंका दरम्यान फेरी सेवेचा पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ PM Modi launches ferry service between India and Sri Lanka

    भारत आणि श्रीलंका दरम्यान फेरी सेवेचा पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ

    नागपट्टिनम आणि कानकेसंतुराई दरम्यान ही फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या फेरी सेवेचा शुभारंभ केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये आम्ही नवीन अध्याय सुरू करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. PM Modi launches ferry service between India and Sri Lanka

    व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि श्रीलंकेचा संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यतेचा सखोल इतिहास आहे आणि आता दोघांमधील आर्थिक भागीदारी देखील वाढेल. नागपट्टिनम आणि कानकेसंतुराई दरम्यान ही फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे आणि आमचे संबंध दृढ करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

    तत्पूर्वी, केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तामिळनाडूतील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंतुराई दरम्यानच्या फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

    आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, अध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी एक करार झाला होता. कनेक्टिव्हिटी हा या भागीदारीचा मध्यवर्ती विषय असल्याचे ते म्हणाले. कनेक्टिव्हिटी म्हणजे केवळ दोन शहरे जवळ आणणे नव्हे, तर दोन देश आणि लोकांना जवळ आणणे. कनेक्टिव्हिटी व्यापार, पर्यटन आणि लोकांमधील संबंध वाढवते.

    PM Modi launches ferry service between India and Sri Lanka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- बेकायदेशीर बांगलादेशी-रोहिंग्यांची ओळख पटवणे सरकारची जबाबदारी; लोक फक्त अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतात

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- जातगणना फक्त स्वयं-घोषणापत्रावर आधारित नसावी, पडताळणी आवश्यक; केंद्राला विचार करण्यास सांगितले

    Indus Waters : भारत सिंधू जल कराराच्या सुनावणीत सहभागी होणार नाही; म्हटले- हे न्यायालय अवैध आहे, याचे आदेश मानत नाही