• Download App
    Ministry of Information and Broadcasting भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको; माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सक्त सूचना!!

    भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको; माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सक्त सूचना!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यात.‌ पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याच्या बेतात असताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध माध्यमांना सक्त सूचना दिल्याने संबंधित कारवाईचे गांभीर्य वाढले आहे.

    भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याच्या नादात अनेकदा शत्रूला फायदा होतो शत्रूच्या लाईव्ह प्रक्षेपणातून नेमके धागेद्वारे उचलून प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो हे लक्षात घेऊन भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवाई यांचे लाईव्ह प्रक्षेपण टाळावे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संबंधित सूचनेत नमूद केले आहे.

    यापूर्वी कंदहार विमान अपहरण, कारगिल युद्ध आणि मुंबई वरचा 26/ 11 चा हल्ला या सगळ्या घटनांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याच्या नादात भारतीय माध्यमांनी भारतीय सुरक्षा दलांचे मोठे नुकसान केले होते. शत्रूला त्या लाईव्ह प्रक्षेपणाचा फायदा झाला होता. लाईव्ह प्रक्षेपणातलेच फुटेज पाहून शत्रूने प्रतिबंधात्मक हालचाली केल्या होत्या, याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाने माध्यमांचे लक्ष वेधले आहे.

    त्यामुळे भारतीय लष्करी हालचालींचे कव्हरेज करताना भारतीय कायद्याचे पालन करावे त्यात कुठलाही हलगर्जीपणा करू नये, अशा सक्त सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने माध्यमांना दिल्यात.

    Ministry of Information and Broadcasting issues advisory to all Media channels

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Petrol, Diesel : आता पेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महाग; मुंबईत पेट्रोल ₹107.59 आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर झाले

    NIA : भारतात घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पोहोचला, स्लीपर सेल नेटवर्क तयार करण्यासाठी आला होता

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीवर भाजपने म्हटले- राहुल भ्रम पसरवताहेत; काँग्रेस 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण करत आहे, आम्ही तत्काळ कारवाई केली