विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : इस्लामचा इतिहास पाहाता पुढील २० वर्षांमध्ये ५० टक्के हिंदूंचं धर्मांतर झालेलं असेल आणि ४० टक्के हिंदूंची हत्या केली जाईल. फक्त १० टक्के हिंदू शिल्लक राहतील, जे अमेरिका, कॅनडा, लंडन आणि युरोप किंवा संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयाला असतील.Looking at the history of Islam, in the next 20 years, 50% of Hindus will have converted and 40% of Hindus will be killed, fear of Swami Narasimhanand
कुठेही मठ, मंदिर नसतील, भीती स्वामी नरसिंहानंद यांनी व्यक्त केली आहे.हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये ही सभा पार पडली. या सभेसाठी देशभरातील मठ आणि मंदिरांचे प्रमुख सहभागी झाले होते. एकूण १५० सहभागी व्यक्तींमध्ये सुमारे ५० महामंडलेश्वर देखील होते
अशी माहिती या सभेचे आयोजक आणि धार्मिक नेते नरसिंहानंद यांनी दिली आहे. या धर्मसंसदेतील तपशील आता समोर येऊ लागला आहे. या सभेचा विषय २०२९मध्ये देशाचं पंतप्रधानपद मुस्लीम व्यक्तीकडे असेल, हा असल्याचे सांगून नरसिंहानंद म्हणाले, २०२९मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी मुस्लीम व्यक्ती असेल, हाच या सभेचा विषय होता.
हा कोणताही निराधार विचार नाही. ज्यांना लोकसंख्येचं गणित कळतं, त्यांना हे माहिती आहे. ज्या पद्धतीने मुस्लीम लोकसंख्या वाढतेय आणि आपली लोकसंख्या घटतेय, येत्या सात ते आठ वर्षांत रस्त्यांवरून फक्त मुस्लीमच फिरताना दिसतील.
नरसिंहानंद म्हणाले, तलवारी विसरा, त्या फक्त शोकेसमध्ये ठेवल्या जातील. आता अधिक चांगल्या शस्त्रांनी लढा दिला जाईल. फक्त चांगली शस्त्रच तुम्हाला वाचवू शकतील. शास्त्रमेव जयते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App