उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने जोरदार फटकारले. न्यायालयाने यूपी सरकारचे वकील हरीश साळवे यांना विचारले की, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक का करण्यात आलेली नाही? हे करून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे? Lakhimpur Kheri Violence Case: Supreme Court reprimands UP government; Asked- Why not arrest the accused of murder, what message do you want to give by doing this
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने जोरदार फटकारले. न्यायालयाने यूपी सरकारचे वकील हरीश साळवे यांना विचारले की, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक का करण्यात आलेली नाही? हे करून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे?
न्यायालयाने विचारले- तुम्ही देशातील इतर कोणत्याही खून प्रकरणात आरोपींना अशीच वागणूक द्याल का? केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष हा 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे, ज्यामध्ये 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा बळी गेला होता.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की, लखीमपूर खीरी प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत त्यावर ते समाधानी नाही. उत्तर प्रदेश सरकारने कोर्टाला सांगावे की, या प्रकरणाची कोणती एजन्सी चौकशी करू शकते. नवीन एजन्सीचा तपास सुरू होईपर्यंत पुराव्याशी छेडछाड होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्याच्या डीजीपींना दिले.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन वकिलांच्या पत्रांची दखल घेत, यूपी सरकारला गुरुवारी विचारले की, या घटनेत किती शेतकरी मारले गेले? किती राजकीय लोक आणि पत्रकार मरण पावले? कोणाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि कोणाला अटक करण्यात आली? यूपी सरकारला आज या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे आशिष मिश्रांच्या अटकेचा दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी आशिषच्या घरी नोटीस चिकटवली आणि त्याला शुक्रवारी म्हणजेच आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यापूर्वी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडे या दोन आरोपींना अटक केली, तर तीन जणांची चौकशी केली जात आहे.
लखनौच्या आयजी लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, आशिष मिश्रा कुठे आहेत, हे माहिती नाही. त्याचवेळी आशिष पांडे आणि लवकुश यांच्यावर शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या थार जीपच्या मागे वाहनात असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, यूपी सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली याप्रकरणी चौकशी आयोगाची स्थापना केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App