AEW&C विमान प्रणाली हवाई दलाची ताकद वाढवेल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Indian government चीन आणि पाकिस्तानसारख्या भारताच्या शत्रूंनी आता सावध राहावे, कारण भारत सरकारने गुरुवारी ५४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध लष्करी उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेला मान्यता दिली.Indian government
यामध्ये अत्याधुनिक अर्ली एअर वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) विमान प्रणाली, स्वदेशी वरुणास्त्र टॉर्पेडो आणि T-90 टँकसाठी अधिक शक्तिशाली इंजिने यांचा समावेश आहे, ज्यामुळे तिन्ही दलांची ताकद वाढेल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) या खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भांडवल अधिग्रहण प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठीच्या वेळा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांना डीएसीने मान्यता दिली, ज्यामुळे ती जलद, अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होईल.
खरेदी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाच्या २०२५ हे ‘सुधारणांचे वर्ष’ म्हणून साजरे करण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, AEW&C विमान प्रणाली हवाई दलाची ताकद वाढवेल. यामुळे लढाईची पद्धत पूर्णपणे बदलू शकते आणि वेगवेगळ्या शस्त्रास्त्र प्रणालींसह लढाईतील ताकद अनेक पटींनी वाढेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App