• Download App
    हिना रब्बानी खार म्हणाल्या, पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही|Hina Rabbani Khar said, Pakistan's dream will never come true because of Prime Minister Modi

    हिना रब्बानी खार म्हणाल्या, पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून $6.5 दशलक्ष बेलआउट पॅकेजला अंतिम रूप देण्याचा सतत प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार म्हणाल्या की, पाकिस्तानला भारतासोबत व्यापार करायचा आहे, पण पंतप्रधान मोदींमुळे तसे करणे शक्य नाही.Hina Rabbani Khar said, Pakistan’s dream will never come true because of Prime Minister Modi

    पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार यांनी अमेरिकन वेबसाइट पॉलिटिकोला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे स्वागत करू, सध्या पंतप्रधान मोदींना तसे करणे कठीण आहे. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत-पाकिस्तानचा व्यवसाय $1.35 अब्ज डॉलरचा होता, तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनसोबतचा भारताचा व्यवसाय $87 मिलियन होता.



    भारत एक हिंदू राष्ट्रवादी प्रशासन – हिना रब्बानी

    भारताशी संबंध पूर्ववत करण्याबाबत बोलताना हिना रब्बानी खार म्हणाल्या की, पाक आणि भारतामध्ये व्यापार हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे संबंध सुधारू शकतात. मात्र, हिना रब्बानी यांनी भारतावर हल्लाबोल करत म्हटले की, हिंदुराष्ट्रवादी प्रशासन आहे, जे हिंदु आणि मुस्लिमांमध्ये भारताचे विभाजन करण्यावर विश्वास ठेवतात.

    त्या म्हणाल्या की, भारताच्या सध्याच्या सरकारमध्ये काहीही योग्य असू शकत नाही. तेथे विशेष लोक सत्तेत आहेत. समस्या कशी सोडवायची हे त्यांना कळत नाही. ते फक्त समस्या वाढवतात.

    पाकिस्तानी राजकारण्यांची वादग्रस्त विधाने

    अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी राजकारण्यांनी भारताविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचा कसाई म्हटले होते. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे केंद्र म्हणत पलटवार केला होता.

    मात्र, पाकिस्तानबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तानने आपल्या सवयी सुधारून चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न करावा, अशी भारताची इच्छा आहे.

    Hina Rabbani Khar said, Pakistan’s dream will never come true because of Prime Minister Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका