• Download App
    आत्मनिर्भर भारत घडविण्यात वायुसेनेचे उल्लेखनीय योगदान, जनरल बिपीन रावत यांनी केले कौतुकGeneral Bipin Rawat lauded the Air Force's remarkable contribution in building a self-reliant India

    आत्मनिर्भर भारत घडविण्यात वायुसेनेचे उल्लेखनीय योगदान, जनरल बिपीन रावत यांनी केले कौतुक

    आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. देशातील प्रत्येक जण याकरिता प्रयत्न करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय वायुसेना महत्वपूर्ण योगदान देत आहे असे कौतुक चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी व्यक्त केले.General Bipin Rawat lauded the Air Force’s remarkable contribution in building a self-reliant India


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. देशातील प्रत्येक जण याकरिता प्रयत्न करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय वायुसेना महत्वपूर्ण योगदान देत आहे असे कौतुक चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी व्यक्त केले.

    रावत यांनी सोमवारी भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील मेन्टेनन्स कमांडला भेट दिली. ते म्हणाले, मेन्टेनन्स कमांड हा भारतीय वायुसेनेचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. वायुसेनेच्या अमूल्य संपत्तीची देखभाल करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. हा विभाग वेगात आत्मनिर्भर होत आहे.


    आत्मनिर्भर भारत, आता एके ४७ चे आधुनिकीकरण करणार भारतीय कंपनी


    आपण आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मेन्टेनन्स कमांडची आत्मनिर्भरता विदेशी सेवांवरील अवलंबित्व कमी करेल. त्यातून देशाची प्रगती होईल. याशिवाय जीवनमान उंचावण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठीही मेन्टेनन्स कमांडद्वारे प्रशंसनीय प्रयत्न केले जात आहेत.

    General Bipin Rawat lauded the Air Force’s remarkable contribution in building a self-reliant India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही