वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Farmers पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या (Punjab) पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अडवले. समजूत घालून त्यांना परत जाण्यास सांगितले. Farmers
पण आंदोलक बॅरिकेड्स ढकलून पुढे जाऊ लागले. पोलिसांशी त्यांची धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. वॉटर कॅनने पाण्याचा माराही केला. यात सुमारे १७ आंदोलक शेतकरी जखमी झाले.Farmers
यादरम्यान शंभू सीमेवर लुधियानातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचे नाव जोधसिंह असल्याचे सांगितले जाते. शेतकरी नेते तेजवीरसिंह यांनी सांगितले की, जोधाची प्रकृती गंभीर आहे. जखमींची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्त रस्त्यातच थांबण्याचा निर्णय घेतला.Farmers
शेतकरी मजदूर मोर्चाचे महासचिव सरवनसिंह पंधेर म्हणाले, 16 डिसेंबर रोजी पंजाबचा अपवाद वगळता देशभर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. 18 डिसेंबरला पंजाबमध्ये रेल रोको करणार आहोत.
पंधेर म्हणाले, शेतकऱ्यांवर केमिकलयुक्त पाणी, बॉम्ब फेकण्यात आले. त्यामुळे काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
Farmers Nationwide tractor march tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra ministry formula : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचेच वर्चस्व??; हे तर महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!!
- Mahakumbh : पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाकुंभासाठी कलशाची स्थापना; पीएम म्हणाले- गुलामगिरीच्या काळातही कुंभावरील श्रद्धा थांबली नाही
- Fadnavis governments : ठरलं! 15 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार
- Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!