• Download App
    Farmers दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा

    Farmers : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Farmers पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या (Punjab) पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अडवले. समजूत घालून त्यांना परत जाण्यास सांगितले. Farmers

    पण आंदोलक बॅरिकेड्स ढकलून पुढे जाऊ लागले. पोलिसांशी त्यांची धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. वॉटर कॅनने पाण्याचा माराही केला. यात सुमारे १७ आंदोलक शेतकरी जखमी झाले.Farmers

    यादरम्यान शंभू सीमेवर लुधियानातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचे नाव जोधसिंह असल्याचे सांगितले जाते. शेतकरी नेते तेजवीरसिंह यांनी सांगितले की, जोधाची प्रकृती गंभीर आहे. जखमींची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्त रस्त्यातच थांबण्याचा निर्णय घेतला.Farmers

    शेतकरी मजदूर मोर्चाचे महासचिव सरवनसिंह पंधेर म्हणाले, 16 डिसेंबर रोजी पंजाबचा अपवाद वगळता देशभर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. 18 डिसेंबरला पंजाबमध्ये रेल रोको करणार आहोत.

    पंधेर म्हणाले, शेतकऱ्यांवर केमिकलयुक्त पाणी, बॉम्ब फेकण्यात आले. त्यामुळे काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

    Farmers Nationwide tractor march tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया