निवडणूक आयोगाचा राजकारण्यांना सल्ला, भाषणात संयम पाळा, स्टार प्रचारकांकडून सामाजिक बांधणीला ठेच नको

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये स्टार प्रचारक, विशेषत: राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी चांगले उदाहरण मांडावे आणि समाजाच्या नाजूक आराखड्याला हानी पोहोचवू नये, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने मंगळवारी व्यक्त केली. उर्वरित टप्प्यांमध्ये भाषणे संयत ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने नेत्यांची आहे, असे आयोगाने म्हटले आहे. हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अनेक नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.Election Commission advice to politicians, exercise restraint in speech, do not disturb social construction by star campaigners



निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर नागरी समाज नाराज

निवडणूक आयोगावर नागरी समाजाचा दबाव वाढत आहे. चार टप्प्यातील निवडणुकीनंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत शंका-कुशंका असताना सुजाण नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयोगाची भेट घेतली. हे शिष्टमंडळ 4000 सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन आयोगाकडे पोहोचले. त्यांची मागणी होती की फॉर्म 17 सी च्या भाग एक नुसार मतदानाचा डेटा सार्वजनिक केला जावा.देशातील 12 शहरांमधून मोठी मोहीम सुरू झाली असताना शिष्टमंडळाने आयोगाशी संपर्क साधला.या मोहिमेला ग्रो युवर स्पाइन ईसीआय (स्ट्रेंथन युवर स्पाइन इलेक्शन कमिशन) हे नाव दिले आहे. येथून शेकडो पोस्टकार्ड आयोगाकडे पाठवली जात आहेत.

Election Commission advice to politicians, exercise restraint in speech, do not disturb social construction by star campaigners

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात