Monsoon session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बारा दिवस उलटून गेले आहेत, पण विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण आणि शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्यांवर रान पेटवले आहे. या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. संसद आतापर्यंत दोन्ही सभागृहांमध्ये 107 तासांपैकी फक्त 18 तास चालू शकली आहे. यामुळे करदात्यांच्या 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एकीकडे विरोधक सरकारला जाब विचारत आहेत, पण सरकारला उत्तर देण्यासाठी वेळही देत नाहीयेत. During Monsoon session parliament functioned for 18 hours only so far loss to taxpayers more than rs 133 crores
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बारा दिवस उलटून गेले आहेत, पण विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण आणि शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्यांवर रान पेटवले आहे. या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. संसद आतापर्यंत दोन्ही सभागृहांमध्ये 107 तासांपैकी फक्त 18 तास चालू शकली आहे. यामुळे करदात्यांच्या 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एकीकडे विरोधक सरकारला जाब विचारत आहेत, पण सरकारला उत्तर देण्यासाठी वेळही देत नाहीयेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले, परंतु आतापर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज जवळपास विस्कळीतच राहिले आहे. अधिवेशनात आतापर्यंत 89 तास गोंधळाचेच ठरले आहेत. अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राज्यसभेचे कामकाज नियोजित वेळेच्या केवळ 21% टिकले आहे, तर लोकसभेचे कामकाज केवळ 13% झाले आहे. लोकसभा 54 तासांपैकी 7 तासांपेक्षा कमी वेळ चालली, तर राज्यसभा 53 तासांपैकी 11 तास चालली.
गोंधळामुळे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात सभागृहाची उत्पादकता 13.70% कमी झाली. पहिल्या आठवड्यात हा आकडा 32.20%होता. या मुद्द्यावर विरोधकांचे म्हणणे आहे की जोपर्यंत सरकार हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार नाही, तोपर्यंत विरोध संपणार नाही. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे आणि लोकसभेत म्हटले आहे की, ही मुळीच समस्या नाही.
28 जुलै रोजी विरोधी खासदारांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्रके फेकली. या भेटीदरम्यान खासदारांनी ‘खेला होबे’च्या घोषणाही दिल्या. या दिवशी अनेक वेळा कारवाई पुढे ढकलावी लागली.
पत्रके फेकल्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी 10 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्याचा इशारा दिला होती. एएनआयच्या मते, यात खासदार गुरजीत सिंह औजला, टीएन प्रथापन, मणिकम टागोर, रवनीत सिंग बिट्टू, हिबी ईडन, जोथी मनी सेनामलई, सप्तगिरी संकरा उल्का, व्ही. वैथिलिंगम आणि एएम आरिफ यांची नावे समाविष्ट होती.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 28 जुलै रोजी 14 समविचारी विरोधी पक्षांची बैठक घेतली. यामध्ये सरकारला घेरण्याची योजना आखण्यात आली. बैठकीनंतर राहुल म्हणाले होते की, आम्ही पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाही.
काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, राष्ट्रीय समाज पक्ष, केरळ काँग्रेस (एम.), विदुथलाई चिरुथैगल काची आणि एसएस पक्षाचे नेते यात सहभागी झाले होते.
During Monsoon session parliament functioned for 18 hours only so far loss to taxpayers more than rs 133 crores
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App