Shashi Tharoor : काँग्रेससोबत मतभेद, शशि थरूर नाराज – “बुद्धिमत्ता कधी कधी मूर्खता ठरते”

Shashi Tharoor

प्रतिनिधी

नवी दिल्ली :Shashi Tharoor   केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारच्या धोरणांचे कौतुक केल्याने काँग्रेस नेते शशि थरूर आणि पक्षामधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी शनिवारी सोशल मीडिया ‘X’ वर एक पोस्ट करत म्हटले की – “बुद्धिमत्ता कधी कधी मूर्खता ठरते.”Shashi Tharoor

थरूर यांची नाराजी – पक्षात दुर्लक्षित केल्याची भावना

थरूर यांनी ब्रिटिश कवी थॉमस ग्रे यांच्या ‘ओड ऑन ए डिस्टंट प्रॉस्पेक्ट ऑफ ईटन कॉलेज या कवितेतील ओळ शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले होते – “जिथे लोक अज्ञानात आनंद शोधतात, तिथे बुद्धिमत्ता दाखवणे मूर्खपणाच ठरते.”


 

थरूर यांनी 18 फेब्रुवारीला दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली आणि पक्षाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की,

– त्यांना संसदेमध्ये महत्त्वाच्या चर्चांमध्ये बोलण्याची संधी दिली जात नाही.
– पक्षामध्ये त्यांना दुर्लक्षित केले जात आहे.
– पक्षात आपली भूमिका स्पष्ट करून सांगावी, अशी मागणी त्यांनी राहुल गांधींकडे केली.

राहुल गांधींकडून स्पष्टता नाही

माध्यमांतील माहितीनुसार, राहुल गांधी यांनी थरूर यांच्या तक्रारींना कोणताही ठोस प्रतिसाद दिला नाही, तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्याचेही आश्वासन दिले नाही. यामुळे थरूर यांना पक्षामध्ये त्यांच्या भविष्याबाबत अधिकच संभ्रम वाटू लागला आहे.

शशि थरूर यांना पक्षात साइडलाइन करण्यामागील 2 कारणे

1. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकन दौऱ्याचे कौतुक

काँग्रेसचे अधिकृत धोरण डावलत थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन दौऱ्याची प्रशंसा केली. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी म्हटले होते– पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट भारतासाठी सकारात्मक ठरली. मी एक भारतीय म्हणून याचे कौतुक करतो.
यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते नाराज झाले.

2. केरळ सरकारच्या धोरणांचे समर्थन

थरूर यांनी LDF सरकारच्या औद्योगिक धोरणाचे समर्थन करणारा लेख लिहिला, ज्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला. या लेखात थरूर म्हणाले होते की –
“केरळ भारताच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या सक्षम स्थितीत आहे.”

केरळ काँग्रेसकडून थरूर यांना सूचक इशारा

केरळ काँग्रेसच्या मुखपत्र ‘वीक्षणम डेली’मध्ये थरूर यांना अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आला. संपादकीयात लिहिले होते– “स्थानिक निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अपेक्षांना धक्का लागू नये. हजारो कार्यकर्त्यांच्या आशा धुळीस मिळवू नका.”

याच लेखात “अहिंसा पुरस्कार जल्लाद” या मथळ्याखाली केरळच्या औद्योगिक क्षेत्राच्या ऱ्हासाचा उल्लेख केला गेला. तसेच, माजी मुख्यमंत्री आर. शंकर, सी. अच्युत मेनन, के. करुणाकरण, ए. के. अँटनी आणि ओमन चांडी यांच्या कार्यकाळातील औद्योगिक विकासावर चर्चा करण्यात आली.

थरूर यांचे काँग्रेससोबत नाते अधिक ताणले जाण्याची शक्यता

शशि थरूर यांची पक्षातील भूमिका अधिक अस्पष्ट होत चालली आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून, त्यांना साइडलाइन केले जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आता थरूर पुढे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Differences with Congress, Shashi Tharoor upset – “Intelligence sometimes turns into stupidity”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात