विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार म्हणतेय, कोरोनाचा व्हेरीएंट ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे आणि दुसरीकडे सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यात खूपच कमी पडते आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 60 % नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु महिना अखेरीला आठ दिवस शिल्लक राहिले असताना फक्त 40% नागरिकांचे देखील लसीकरण पूर्ण झालेले नाही. सरकार बुस्टर ङोस कधी देणार?, असा खडा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केला आहे. Danger of omecron: Vaccination slows down, when will the whole of India be vaccinated ?; Rahul Gandhi’s tough question to Modi government
Majority of our population is still not vaccinated. When will GOI begin booster shots? #VaccinateIndia pic.twitter.com/IPQOP36vXZ — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2021
Majority of our population is still not vaccinated.
When will GOI begin booster shots? #VaccinateIndia pic.twitter.com/IPQOP36vXZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2021
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मधून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार म्हणते आहे की, ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे. कोरूना प्रतिबंधक लसीकरणाचे डिसेंबर 2021 पर्यंतचे टार्गेट 60 % नागरिकांचे पूर्ण लसीकरण असे ठेवण्यात आले होते. परंतु सध्याच्या लसीकरणाचा दर बघितला तर 40% नागरिकांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत सुमारे 42 % नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. याचा अर्थ 18% डेफिसिट आहे. सरकार लसीकरण पूर्ण कधी करणार? आणि त्यानंतर बूस्टर डोस कधी देणार?, असा सवाल राहुल गांधींनी या ट्विट मधून केला आहे.
यासाठी त्यांनी टीव्हीच्या एनडीटीव्हीच्या बातमीचा आधार घेतला आहे. एनडीटीव्हीने सध्याचा लसीकरणाचा देशातला सरासरी दर लक्षात घेऊन 42 % नागरिकांचे लसीकरण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App