वृत्तसंस्था
कोलकाता : Congress WB काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने स्वतःला राज्यात जनतेसाठी तिसरा पर्याय म्हणून सादर केले.Congress WB
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा ₹2,000 ची आर्थिक मदत, पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण आणि राज्यात मोफत सरकारी वाहतूक सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.Congress WB
शेतकऱ्यांसाठीच्या जाहीरनाम्यात लहान आणि भूमिहीन शेतकऱ्यांना दरवर्षी ₹15 हजारची मदत आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला ₹10 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा कवच देण्याचे वचन दिले आहे.
काँग्रेसने बंगालमधील तरुणांसाठी युवा सन्मान योजना आणि बंगाल रोजगार हमी अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत एका वर्षात राज्यातील सर्व रिक्त सरकारी पदे भरली जातील.
Kolkata, West Bengal: On the launch of Congress Manifesto ahead of Assembly elections, Congress National President Mallikarjun Kharge says, "Today, the biggest problem of West Bengal, as I said, is unemployment. The situation has become so serious that they have to leave the… pic.twitter.com/2F4xNbG688 — IANS (@ians_india) April 7, 2026
Kolkata, West Bengal: On the launch of Congress Manifesto ahead of Assembly elections, Congress National President Mallikarjun Kharge says, "Today, the biggest problem of West Bengal, as I said, is unemployment. The situation has become so serious that they have to leave the… pic.twitter.com/2F4xNbG688
— IANS (@ians_india) April 7, 2026
भ्रष्टाचार, बेरोजगारी या बंगालमधील सर्वात मोठ्या समस्या – खरगे
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, बंगालमधील सर्वात मोठ्या समस्या भ्रष्टाचार आणि बेरोजगारी आहेत. त्यांनी असा आरोप केला की, राज्यात भ्रष्टाचार वाढला असून त्याचा बंगालच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. तरुण नोकरीच्या शोधात राज्य सोडून जात आहेत.
काँग्रेसने रोजगार हमी अभियान, प्रदूषण कमी करणे, कौशल्य विकास आणि एआय शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, महिलांना अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती बनवण्यासाठी सक्षम करण्याचे आवाहनही केले आहे.
त्याचबरोबर स्टार्टअप्सना निधी आणि कौशल्य विकासासोबत एआय (AI) शिक्षणावर विशेष लक्ष दिले जाईल. तर आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचार थांबला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App