भारताच्या संपूर्ण बजेटच्या 15 % रक्कम फक्त मुसलमानांना देण्याचा काँग्रेसचा डाव; पंतप्रधान मोदींचा नाशकातून गंभीर आरोप!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे टप्प्याटप्प्याने वाभाडे काढत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीच्या सभेत काँग्रेसचे आणखी वाभाडे काढले. देशात काँग्रेस धर्मावर आधारित आरक्षण देऊ पाहत असल्याचा आरोप मोदींनी आधी केलाच होता. आता त्या पलीकडे जाऊन भारताच्या संपूर्ण बजेटच्या तब्बल 15 % रक्कम म्हणजे लाखो करोडो रुपये फक्त मुसलमानांवर खर्च करण्याचा डाव काँग्रेस रचत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला. आपण अत्यंत गंभीर आरोप करत असल्याचे मोदींनी आधीच स्पष्ट केले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा डाव उलगडून दाखवला.Congress plan to give 15% of India’s entire budget to Muslims only; Prime Minister Modi’s serious accusation from Nashka!!

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारतीय पवार आणि नाशिकचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा झाली.



पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण आता फार खोलवर रुजत चालले आहे आधी काँग्रेसवाले म्हणायचे देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. नंतर त्यांनी जातनिहाय जनगणनेच्या नावाखाली देशात डॉ. आंबेडकरांना मान्य नसलेले धर्मावर आधारित आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात ओबीसींचे आरक्षण हिरावून त्यामध्ये मुस्लिम समाजाला घुसवले. आता त्या पाठोपाठ देशाच्या संपूर्ण बजेट मधली तब्बल 15 % रक्कम मुसलमानांच्या कब्जात देण्याचा डाव काँग्रेस रचत आहे. देशातल्या संपूर्ण बजेट मधली 15 % रक्कम अल्पसंख्यांकांच्या नावाखाली फक्त मुसलमानांवर खर्च करण्याचा काँग्रेसने डाव रचला आहे. यापूर्वी देखील त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु मी मुख्यमंत्री असताना भाजपने काँग्रेसचा तो डाव ओळखून त्याला प्रचंड विरोध केला. त्यामुळे काँग्रेसचा त्यावेळचा डाव उधळून गेला. आता काँग्रेस नव्याने प्रयत्न करून देशातल्या बजेटचा तब्बल 15 % हिस्सा फक्त मुसलमानांना देण्याचे कारस्थान रचत आहे असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या सभेत अन्य विषयांना देखील स्पर्श केला. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे दुबळ्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की असल्याचा टोला त्यांनी ठाकरे आणि पवारांना हाणला.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एवढा दारूण पराभव होणार आहे की मान्यताप्राप्त विरोधी पक्ष असे देखील त्यांचे स्थान राहणार नाही. पण या दुबळ्या काँग्रेसमध्ये नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विलिनीकरण नक्की होणार आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे वाभाडे काढले.

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वांत जास्त बाळासाहेब ठाकरे आठवण येईल. ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करीन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याची आठवण मोदींनी करून दिली. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारणे आणि जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवून टाकणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोप नरेंद मोदी यांनी केला.

सावरकरांचा अपमान ठाकरे सहन करतात

वीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना नकली शिवसेना डोक्यावर घेऊन फिरत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामधील संताप प्रचंड उसळतो. मात्र आपल्या अहंकारात चूर झालेल्या नकली शिवसेनेच्या नेत्यांना सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा राग येत नाही. त्यामुळे आता नकली शिवसेनेला शिक्षा करण्याचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण ठोकारले, तर नकली शिवसेनेने देखील तोच मार्ग अवलंबला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राम मंदिराबद्दल उलटसुलट बोलत आहे मात्र, नकली शिवसेना यावर काहीही बोलत नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गेल्या 10 वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तुमची सेवा हेच माझे सर्वात मोठे लक्ष असल्याचेही मोदी यांनी या वेळी म्हटले आहे.

जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल वाराणसी आणि आज त्र्यंबकेश्वरच्या धरतीमधून मी सर्वांना प्रणाम करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

काठी, घोंडगी आणि गांधी टोपी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गंगापूत्र म्हणून उल्लेख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गंगापूत्र म्हणून केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. नाशिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी घेऊन येणारे म्हणून मोदी गंगापूत्र ठरतील असा विश्वास या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मतांच्या लाचारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Congress plan to give 15% of India’s entire budget to Muslims only; Prime Minister Modi’s serious accusation from Nashka!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात