कोलंबिया सरकारने आपले विधान मागे घेतले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shashi Tharoor शशी थरूर यांच्या कडक भूमिकेमुळे कोलंबिया सरकार ताळ्यावर आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सरकारने अधिकृतपणे आपले विधान मागे घेतले आहे.Shashi Tharoor
एक दिवस आधी शशी थरूर यांनी कोलंबियाच्या राजधानीत आक्षेप घेतला होता की कोलंबिया सरकारने दहशतवाद्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. आता कोलंबिया सरकारने हे विधान मागे घेतल्याने हा भारताचा एकप्रकारे राजनैतिक विजय म्हटले जात आहे.
भारतातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची माहिती देत आहे. भारत सरकारने सात शिष्टमंडळे तयार केली आहेत, ज्यात प्रत्येक राजकीय पक्षाचे खासदार आहेत. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील असे एक शिष्टमंडळ एक दिवस आधी कोलंबियाला पोहोचले होते. शशी थरूर यांनी कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे त्यांच्या सरकारच्या विधानाबाबत निराशा व्यक्त केली होती.
थरूर यांनी राजधानी बोगोटा येथे सांगितले की कोलंबिया सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. यावर थरूर यांना म्हटल की, कदाचित त्यांना परिस्थिती पूर्णपणे समजली नसेल. भारतीय हल्ल्यात मारले गेलेले लोक सामान्य नागरिक नव्हते, ते सर्व दहशतवादी होते.
कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री रोझा योलांडा विलाविचेंसियो यांनीही भारतीय शिष्टमंडळाची भेट घेतली. बैठकीनंतर उपपरराष्ट्र मंत्री म्हणाल्या की, आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे आणि काश्मीरमधील खऱ्या परिस्थितीबद्दल आणि घडलेल्या घटनेबद्दल आमच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आम्ही चर्चा सुरू ठेवू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.
कोलंबिया सरकारच्या प्रतिक्रियेवर थरूर म्हणाले की, उपपरराष्ट्र मंत्री यांनी अतिशय विनम्रपणे सांगितले की, आम्ही ज्या विधानात चिंता व्यक्त केली होती, ते त्यांनी आता मागे घेतले आहे. त्यांना आता आमची भूमिका पूर्णपणे समजली आहे. हे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App