वृत्तसंस्था
दिसपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (एनआरसी) हिंदू- मुस्लिम यांच्यात दुफळी निर्माण होणार नाही.नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.Citizenship law will not harm to any Muslim; Sarsanghchalak Mohan Bhagwat
मोहन भागवत दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते Citizenship debate over NRC and CAA-Assam and the Politics of History या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
त्यावेळी ते नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत बोलत होते. त्याबाबत अकारण धार्मिक रंग दिला जात असून राजकीय फायद्यासाठी विरोध केला जात आहे.
अल्पसंख्यक समाजाची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असे स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान यांनी सांगितले होते. त्या प्रमाणे ती घेतली गेली आहे व यापुढेही घेतली जाईल. नागरिकत्व दुरुस्ती कायदामुळे कोणत्याही मुस्लिमांचे नुकसान होणार नाही. परदेशातील अल्पसंख्य समाजातील नागरिकांना या कायद्याचा लाभ होईल, असे भागवत म्हणाले.
भागवत म्हणाले, “या देशांमध्ये आपत्तीत बहुसंख्य समाजांपर्यंत आपण पोहोचत आहोत. म्हणून जर धमक्या व भीतीमुळे आपल्या देशात येण्याची इच्छा असणारे काही लोक असतील तर त्यांना नक्कीच मदत करावी लागेल,” असे भागवत म्हणाले.
एनआरसीबद्दल बोलताना ते म्हणाले की सर्व देशांना आपले नागरिक कोण आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. हे प्रकरण राजकीय क्षेत्रात आहे कारण सरकार त्यात सामील आहे … लोकांच्या एका गटाला या दोन मुद्यावर जातिभेद तयार करून राजकीय लाभ मिळवायचे आहे, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App