वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की आधीची भारत सरकारने संपूर्ण जगाकडे मदत मागायची, पण आता मात्र दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणारा देश भारतापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जगाकडे भीक मागतो, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे “रहस्य” उलगडून दाखविले. Before the terrorist attack, the Indian government sought help from the entire world.
हिंदुस्थान टाइम्सने आयोजित केलेल्या लीडरशिप मीट मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारच्या काळात देशाने केलेल्या अचिव्हमेंट्स पंतप्रधान मोदींनी सविस्तर सांगितल्या. देशातली बहुसंख्य जनता गरिबी रेषेच्या वर आली. मध्यमवर्गीयांची संख्या वाढली. ही संख्या जगातल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्या पेक्षा दुप्पट – तिप्पट असल्याची नोंद संपूर्ण जगाने घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून सांगितले. भारत जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करेल आणि 2030 पूर्वीच आपण आपले लक्ष्य गाठले असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
पहले आतंकी हमला होता था, तो हमारी सरकारें दुनिया से अपील करती थीं कि हमारी मदद करिए, आतंकियों को रोकिए। हमारी सरकार में आतंकी हमला हुआ, तो हमले का जिम्मेदार देश दुनिया भर से खुद को बचाने की गुहार लगाता रहा: हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (सोर्स:… pic.twitter.com/IAfQRKse9i — ANI_HindiNews (@AHindinews) November 4, 2023
पहले आतंकी हमला होता था, तो हमारी सरकारें दुनिया से अपील करती थीं कि हमारी मदद करिए, आतंकियों को रोकिए। हमारी सरकार में आतंकी हमला हुआ, तो हमले का जिम्मेदार देश दुनिया भर से खुद को बचाने की गुहार लगाता रहा: हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
(सोर्स:… pic.twitter.com/IAfQRKse9i
— ANI_HindiNews (@AHindinews) November 4, 2023
पंतप्रधान मोदींचे तडाखे
त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे रहस्य उलगडून सांगितले. 2014 पूर्वी भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की त्यावेळची भारत सरकारे संपूर्ण जगाकडे दहशतवादापासून भारताला वाचवण्यासाठी विनंती करायची, पण आता परिस्थिती पालटली आहे. भारतात दहशतवादी हल्ला झाला तर दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा देश संपूर्ण जगाकडे भारतापासून आपला बचाव करण्यासाठी भीक मागत हिंडतो. कारण भारत आता दहशतवादाला जशास तसे उत्तर देतो. किंबहुना दहशतवाद पूर्ण मोडून पडेल असा प्रखर प्रहार करतो, याची जाणीव दहशतवादालाची चिथावणी देणाऱ्या देशांना झाली आहे म्हणूनच त्यांना भारतापासून बचावासाठी जगाकडे भीक मागावी लागते, असे जबरदस्त टोले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाणले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App